शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महावितरणला भरपाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:03 IST

वीज जोडणी न देताच ग्राहकाच्या माथी बिल थोपवल्याने व अवाजवी बिल दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने दिला आहेत. दोन प्रकरणांत असा निर्णय दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीज जोडणी न देताच ग्राहकाच्या माथी बिल थोपवल्याने व अवाजवी बिल दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने दिला आहेत. दोन प्रकरणांत असा निर्णय दिला आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील माथा येथील राजाबाई रामजी खराटे यांनी कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता महावितरण हिंगोली यांच्याविरूद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे २९ नोव्हेंबर २०१७ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. राजाबाई यांची माथा येथे जमीन असून त्यांनी महावितरणकडे शेतीपयोगाकरिता वीजपुरवठ्यासाठी महावितणकडे ७ हजार १०० रूपये रक्कम भरून कोटेशन भरले. परंतु वीजपुरवठा करण्यात आला नाही. याबाबत तक्रारदारांनी वारंवार वीजजोडणीसाठी निवेदने दिली. तरीही कार्यवाही न झाल्याने पाच वर्ष शेती पिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे वीजपुरवठा केला नसतानाही महवितरणने राजाबाई खराटे यांना वीजबिल पाठविले. याबाबत त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे दाद मागितली. सदर खटला न्याय मंचात चालला.विरूद्ध पक्षाने तक्रारदार यास एकरक्कमी नुकसान भरपाई एक लाख रूपये एका महिन्यात द्यावी. तसेच सत्वर वीज जोडणी आजपासून एक आठवड्यात द्यावी. अन्यथा त्यानंतर प्रतिदिन शंभर रूपये खर्च व नुकसान म्हणून द्यावी लागेल.तक्रारदारास दिलेले वीजबिल रद्द करावे व सदर प्रकरणाचा पाच हजार रूपये खर्च महावितरणने द्यावा, असा आदेश न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी, सदस्या एन. के. कांकरिया यांनी दिले.महावितरणच्या अवाजवी वीज बिलांमुळे वीज ग्राहक वैतागले आहेत. अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महावितरणचे अधिकारीही वीज ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.तक्रार : जिल्हा ग्राहक तक्रार निवारणचा दणकाडॉ. महेश मधुकरराव सवंडकर यांनीही कार्यकारी अभियंता राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. शहर विभाग, हिंगोली व सहाय्यक अभियंता विद्युत कंपनी वसमत यांच्याविरूद्ध न्याय मंचात १२ डिसेंबर २०१७ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. विरोधी पक्षाने वीज ग्राहकास नुकसान भरपाईचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी यांनी ९ आॅक्टोबर २०१८ रोजी दिले. संवडकर यांना महावितरणने दिलेले ५९ हजार ४०० रूपये वीजबिल बेकायदेशिर घोषित केले. महावितरणने मार्च २०१६ ते मार्च २०१७ या वर्षाच्या काळासाठी रक्कम १७ हजार ६०८.१४ ऐवढे विजबिल स्वीकारणे व ते अंतिम भरलेल्या रक्कमेतून जमा करून घ्यावे. उर्वरित रक्कम १२ हजार ३९२ विरोधी पक्षाने तक्रारदार सवंडकर परत करावी. तसेच मानसिक त्रास झाल्याने ५ हजार रूपये देण्याचा आदेश पारित केला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCourtन्यायालय