शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

इनामी जमिनींबाबत पुन्हा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:57 IST

बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पुन्हा संबंधित संस्थानाच्या नावाने करण्याबाबत पुनरिक्षणाच्या प्रलंबित प्रकरणांवर पुन्हा शासनाने निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वीही पुनरिक्षणाचे आदेश दिले असतानाही अनेक ठिकाणी अशी प्रकरणे प्रलंबित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पुन्हा संबंधित संस्थानाच्या नावाने करण्याबाबत पुनरिक्षणाच्या प्रलंबित प्रकरणांवर पुन्हा शासनाने निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वीही पुनरिक्षणाचे आदेश दिले असतानाही अनेक ठिकाणी अशी प्रकरणे प्रलंबित आहेत.देवस्थान, वक्फच्या इनामी जमिनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता अनेकांनी हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारी होत्या. अशा प्रकरणांचे पुनरिक्षण करण्याचा आदेश २0१0 मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या होत्या. मात्र तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये अशी प्रकरणे प्रलंबित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी विविध अडचणी येत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत सदर संस्थानच्या विश्वस्तांचा शोध घेवून त्यांच्या ताब्यात जमिनी द्याव्यात. ते नसल्यास धर्मादाय आयुक्त अथवा राज्य शासनानेच अशा जमिनींचे संरक्षण करण्यास सांगितले आहे.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संस्थानांच्या व वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत. मात्र त्यात अनेक ठिकाणी इतरांनीच बेकायदेशीर ताबा घेतल्याच्या तक्रारी अजूनही कायम आहेत. अशी अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना शासनाने दिलेल्या आदेशानंतरही यात अनेक जिल्ह्यांत महसूल प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आदेशाद्वारे पुन्हा कारवाईचे निर्देश दिले. आता या निर्णयानंतर याला गती येण्याची शक्यता आहे. या निर्णयात हा विषय विभागीय आयुक्तांनी दरमहा आढाव्यात घेण्यासही सांगितले आहे. यामुळे इनामी जमिनींचे संरक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा शासनाने पावले उचलल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCourtन्यायालय