शहरं
Join us  
Trending Stories
1
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
2
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
3
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
4
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
5
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
6
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
7
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
8
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
9
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
10
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
11
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
12
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
13
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
14
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
15
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
16
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
17
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

आरोपीच्या अटकेनंतरच ‘त्या’ प्रकरणाची साखळी होणार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

वसमत : मयत झाल्यानंतर १३ वर्षांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज देण्याचा प्रताप युनियन बँकेच्या वसमत शाखेने केला. बनावट कर्ज देणाऱ्या ...

वसमत : मयत झाल्यानंतर १३ वर्षांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज देण्याचा प्रताप युनियन बँकेच्या वसमत शाखेने केला. बनावट कर्ज देणाऱ्या साखळीने असे अनेक कारणामे केल्याचा संशय आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ जणांवर वसमत येथे गुन्हा दाखल झाला. मात्र, आरोपींना पकडून चौकशीची गरज आहे. या चौकशीतच साखळी उघड होऊ शकते. आरोपी फरार दाखवण्याची परंपरा कायम राहते की प्रत्यक्ष अटक करून चौकशी होते यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.

वसमत तालुक्यातील चोंढीतर्फे सेंदुरसना येथील मयत शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलण्यात आल्याची तक्रार म. बशीर नदाफ यांनी पोलिसांत दिली. सर्व पुरावे कागदपत्रे देऊनही वर्षभर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. लोकशाही दिनात तक्रार दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना तक्रारी पाठवल्या. तक्रारीची चौकशीही होत नव्हती. तक्रारदाराने वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज उचलण्याचे हे एकच प्रकरण नसून बनावट परस्पर कर्ज उचलण्याचे अनेक प्रकार घडल्याची तक्रारदारांची तक्रार आहे. याप्रकरणातील आरोपीत युनियन बँकेचे शाखाधिकारी, रोखपाल, खाते तपासणीस, दुय्यम निबंधक डफडे, तलाठी संजय वाहिले, मंडळ अधिकारी केशव अंभोरे, बनावट आधार कार्ड बनवून देणारे आदी १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये असलेले दुय्यम निबंधक हे सध्या अकलूज येथे कार्यरत आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे ते फरार असल्याचा प्रश्न येत नाही. पोलिसांनी आता या आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची गरज आहे. अटकपूर्व जमानतीसाठी रस्ता मोकळा राहिला तर बनावट कर्ज प्रकरणाचे रॅकेट गुलदस्त्यात राहण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना गंडवणारी टोळी वसमतमध्ये कार्यरत आहे. यात अनेक प्रतिष्ठित म्हणवणारेही आहेत. अधिकाऱ्यांसोबत राहणारे पोट कर्मचारी व वसुलीसाठी सुरक्षित म्हणून नियुक्त असलेले खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून अधिकारीही अशा प्रकरणात हात धुऊन घेत असतात. कोणी तक्रार दिली तर टोलवाटोलवी करून तक्रारदारालाच त्रस्त केले जाते. एखादाच तक्रारदार प्रकरण लावून धरतो. याप्रकरणातही तसेच घडले आहे. आता तरी चौकशी योग्य पद्धतीने करून आरोपी गजाआड हाेणे अपेक्षित आहे. तरच घोटाळ्याची साखळी उजेडात येऊ शकते.

याप्रकरणी तक्रारदार म. बशीर नदाफ यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वसमत शहर पोलिसांनी वर्षभर टाळाटाळ केल्याचे सांगितले. तक्रार नोंदविण्यासाठी जो विलंब झाला तो चौकशीत होणार नाही, यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आरोपी मोठे अधिकारी असल्यामुळे फरार दाखविण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जमानत झाली तर भ्रष्टाचार करणाऱ्यांची साखळी उजेडात येणार नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.