शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या अटकेनंतरच ‘त्या’ प्रकरणाची साखळी होणार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

वसमत : मयत झाल्यानंतर १३ वर्षांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज देण्याचा प्रताप युनियन बँकेच्या वसमत शाखेने केला. बनावट कर्ज देणाऱ्या ...

वसमत : मयत झाल्यानंतर १३ वर्षांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज देण्याचा प्रताप युनियन बँकेच्या वसमत शाखेने केला. बनावट कर्ज देणाऱ्या साखळीने असे अनेक कारणामे केल्याचा संशय आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ जणांवर वसमत येथे गुन्हा दाखल झाला. मात्र, आरोपींना पकडून चौकशीची गरज आहे. या चौकशीतच साखळी उघड होऊ शकते. आरोपी फरार दाखवण्याची परंपरा कायम राहते की प्रत्यक्ष अटक करून चौकशी होते यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.

वसमत तालुक्यातील चोंढीतर्फे सेंदुरसना येथील मयत शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलण्यात आल्याची तक्रार म. बशीर नदाफ यांनी पोलिसांत दिली. सर्व पुरावे कागदपत्रे देऊनही वर्षभर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. लोकशाही दिनात तक्रार दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना तक्रारी पाठवल्या. तक्रारीची चौकशीही होत नव्हती. तक्रारदाराने वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज उचलण्याचे हे एकच प्रकरण नसून बनावट परस्पर कर्ज उचलण्याचे अनेक प्रकार घडल्याची तक्रारदारांची तक्रार आहे. याप्रकरणातील आरोपीत युनियन बँकेचे शाखाधिकारी, रोखपाल, खाते तपासणीस, दुय्यम निबंधक डफडे, तलाठी संजय वाहिले, मंडळ अधिकारी केशव अंभोरे, बनावट आधार कार्ड बनवून देणारे आदी १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये असलेले दुय्यम निबंधक हे सध्या अकलूज येथे कार्यरत आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे ते फरार असल्याचा प्रश्न येत नाही. पोलिसांनी आता या आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची गरज आहे. अटकपूर्व जमानतीसाठी रस्ता मोकळा राहिला तर बनावट कर्ज प्रकरणाचे रॅकेट गुलदस्त्यात राहण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना गंडवणारी टोळी वसमतमध्ये कार्यरत आहे. यात अनेक प्रतिष्ठित म्हणवणारेही आहेत. अधिकाऱ्यांसोबत राहणारे पोट कर्मचारी व वसुलीसाठी सुरक्षित म्हणून नियुक्त असलेले खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून अधिकारीही अशा प्रकरणात हात धुऊन घेत असतात. कोणी तक्रार दिली तर टोलवाटोलवी करून तक्रारदारालाच त्रस्त केले जाते. एखादाच तक्रारदार प्रकरण लावून धरतो. याप्रकरणातही तसेच घडले आहे. आता तरी चौकशी योग्य पद्धतीने करून आरोपी गजाआड हाेणे अपेक्षित आहे. तरच घोटाळ्याची साखळी उजेडात येऊ शकते.

याप्रकरणी तक्रारदार म. बशीर नदाफ यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वसमत शहर पोलिसांनी वर्षभर टाळाटाळ केल्याचे सांगितले. तक्रार नोंदविण्यासाठी जो विलंब झाला तो चौकशीत होणार नाही, यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आरोपी मोठे अधिकारी असल्यामुळे फरार दाखविण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जमानत झाली तर भ्रष्टाचार करणाऱ्यांची साखळी उजेडात येणार नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.