शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

आरोपीच्या अटकेनंतरच ‘त्या’ प्रकरणाची साखळी होणार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

वसमत : मयत झाल्यानंतर १३ वर्षांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज देण्याचा प्रताप युनियन बँकेच्या वसमत शाखेने केला. बनावट कर्ज देणाऱ्या ...

वसमत : मयत झाल्यानंतर १३ वर्षांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज देण्याचा प्रताप युनियन बँकेच्या वसमत शाखेने केला. बनावट कर्ज देणाऱ्या साखळीने असे अनेक कारणामे केल्याचा संशय आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ जणांवर वसमत येथे गुन्हा दाखल झाला. मात्र, आरोपींना पकडून चौकशीची गरज आहे. या चौकशीतच साखळी उघड होऊ शकते. आरोपी फरार दाखवण्याची परंपरा कायम राहते की प्रत्यक्ष अटक करून चौकशी होते यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.

वसमत तालुक्यातील चोंढीतर्फे सेंदुरसना येथील मयत शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलण्यात आल्याची तक्रार म. बशीर नदाफ यांनी पोलिसांत दिली. सर्व पुरावे कागदपत्रे देऊनही वर्षभर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. लोकशाही दिनात तक्रार दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना तक्रारी पाठवल्या. तक्रारीची चौकशीही होत नव्हती. तक्रारदाराने वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज उचलण्याचे हे एकच प्रकरण नसून बनावट परस्पर कर्ज उचलण्याचे अनेक प्रकार घडल्याची तक्रारदारांची तक्रार आहे. याप्रकरणातील आरोपीत युनियन बँकेचे शाखाधिकारी, रोखपाल, खाते तपासणीस, दुय्यम निबंधक डफडे, तलाठी संजय वाहिले, मंडळ अधिकारी केशव अंभोरे, बनावट आधार कार्ड बनवून देणारे आदी १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये असलेले दुय्यम निबंधक हे सध्या अकलूज येथे कार्यरत आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे ते फरार असल्याचा प्रश्न येत नाही. पोलिसांनी आता या आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची गरज आहे. अटकपूर्व जमानतीसाठी रस्ता मोकळा राहिला तर बनावट कर्ज प्रकरणाचे रॅकेट गुलदस्त्यात राहण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना गंडवणारी टोळी वसमतमध्ये कार्यरत आहे. यात अनेक प्रतिष्ठित म्हणवणारेही आहेत. अधिकाऱ्यांसोबत राहणारे पोट कर्मचारी व वसुलीसाठी सुरक्षित म्हणून नियुक्त असलेले खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून अधिकारीही अशा प्रकरणात हात धुऊन घेत असतात. कोणी तक्रार दिली तर टोलवाटोलवी करून तक्रारदारालाच त्रस्त केले जाते. एखादाच तक्रारदार प्रकरण लावून धरतो. याप्रकरणातही तसेच घडले आहे. आता तरी चौकशी योग्य पद्धतीने करून आरोपी गजाआड हाेणे अपेक्षित आहे. तरच घोटाळ्याची साखळी उजेडात येऊ शकते.

याप्रकरणी तक्रारदार म. बशीर नदाफ यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वसमत शहर पोलिसांनी वर्षभर टाळाटाळ केल्याचे सांगितले. तक्रार नोंदविण्यासाठी जो विलंब झाला तो चौकशीत होणार नाही, यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आरोपी मोठे अधिकारी असल्यामुळे फरार दाखविण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जमानत झाली तर भ्रष्टाचार करणाऱ्यांची साखळी उजेडात येणार नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.