शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

वार्षिक योजनेत तूर्त १० टक्के निधीच उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

हिंगोलीच नव्हे, तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना गतवर्षी कोरोनामुळे निधी खर्च करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. आधी दहा टक्के ...

हिंगोलीच नव्हे, तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना गतवर्षी कोरोनामुळे निधी खर्च करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. आधी दहा टक्के निधीच मिळाला होता. नंतर तीस टक्क्यांचे नियोजन करण्यास सांगितले होते. तर मागच्या दिवाळीनंतर पूर्ण निधी दिला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीला जानेवारीच उगवला होता. त्यात ऐनवेळी अनेक विभागांना निधी खर्च करणे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम म्हणून मागच्या वेळी जवळपास २५ ते ३५ कोटी रुपये पुनर्विनियोजनात गेले. त्यामुळे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना ऐनवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. जि.प., न.प. यासारख्या संस्थांच्या पुढाऱ्यांनी यामध्ये आपापल्या नेत्यांना गळ घालून विकासकामांना निधी आणण्याची संधी साधली. यंदा मात्र किती टक्के निधी खर्च करायचा किंवा काय? याचा काही ठोस आदेश आला नाही. मात्र वार्षिक योजनेच्या एकूण आराखड्यापैकी दहा टक्के निधी उपलब्ध झाला आहे. हिंगोली जिल्ह्याचा १६० कोटींचा सर्वसाधारणचाच आराखडा असल्याने यात १६ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र सध्या तरी यातून इतर कामांवर खर्चाचे नियोजन करता येणार नाही. हा निधी कोरोनाविषयक उपाययोजनांसाठी वापरण्यास सांगण्यात आले आहे.

पुढच्या वर्षभरात जि.प. व न.प.च्या निवडणुका आहेत. त्यामुळे यंदा लवकर निधी मिळण्याची अपेक्षा या संस्थांच्या पदाधिकारी, जि.प.सदस्य, नगरसेवकांना दिसत आहे. तसे झाल्यास तत्काळ नियोजन करून आपल्या कार्यकाळात या निधीचा विनीयोग या मंडळींना करता येणार आहे. अन्यथा पुन्हा नवीन पदाधिकाऱ्यांच्या हाती नियोजन जाण्याची शक्यता आहे. तसे काही विभाग निधी येणार असल्याच्या भरवशावर नियोजनाकडे वळले आहेत. मात्र जि.प.त अंतर्गत वादच उफाळलेले आहेत. तर न.प.मध्ये निधी उपलब्धतेशिवाय नियोजनासाठी कोणी धजावत नसल्याचे दिसत आहे.