शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वार्षिक योजनेत तूर्त १० टक्के निधीच उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

हिंगोलीच नव्हे, तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना गतवर्षी कोरोनामुळे निधी खर्च करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. आधी दहा टक्के ...

हिंगोलीच नव्हे, तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना गतवर्षी कोरोनामुळे निधी खर्च करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. आधी दहा टक्के निधीच मिळाला होता. नंतर तीस टक्क्यांचे नियोजन करण्यास सांगितले होते. तर मागच्या दिवाळीनंतर पूर्ण निधी दिला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीला जानेवारीच उगवला होता. त्यात ऐनवेळी अनेक विभागांना निधी खर्च करणे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम म्हणून मागच्या वेळी जवळपास २५ ते ३५ कोटी रुपये पुनर्विनियोजनात गेले. त्यामुळे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना ऐनवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. जि.प., न.प. यासारख्या संस्थांच्या पुढाऱ्यांनी यामध्ये आपापल्या नेत्यांना गळ घालून विकासकामांना निधी आणण्याची संधी साधली. यंदा मात्र किती टक्के निधी खर्च करायचा किंवा काय? याचा काही ठोस आदेश आला नाही. मात्र वार्षिक योजनेच्या एकूण आराखड्यापैकी दहा टक्के निधी उपलब्ध झाला आहे. हिंगोली जिल्ह्याचा १६० कोटींचा सर्वसाधारणचाच आराखडा असल्याने यात १६ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र सध्या तरी यातून इतर कामांवर खर्चाचे नियोजन करता येणार नाही. हा निधी कोरोनाविषयक उपाययोजनांसाठी वापरण्यास सांगण्यात आले आहे.

पुढच्या वर्षभरात जि.प. व न.प.च्या निवडणुका आहेत. त्यामुळे यंदा लवकर निधी मिळण्याची अपेक्षा या संस्थांच्या पदाधिकारी, जि.प.सदस्य, नगरसेवकांना दिसत आहे. तसे झाल्यास तत्काळ नियोजन करून आपल्या कार्यकाळात या निधीचा विनीयोग या मंडळींना करता येणार आहे. अन्यथा पुन्हा नवीन पदाधिकाऱ्यांच्या हाती नियोजन जाण्याची शक्यता आहे. तसे काही विभाग निधी येणार असल्याच्या भरवशावर नियोजनाकडे वळले आहेत. मात्र जि.प.त अंतर्गत वादच उफाळलेले आहेत. तर न.प.मध्ये निधी उपलब्धतेशिवाय नियोजनासाठी कोणी धजावत नसल्याचे दिसत आहे.