शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईनचा गवगवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:23 IST

सातबारापासून ते फेरफार व इतर सर्वच बाबी आॅनलाईन करण्याचा शासनाचा मानस अजूनही पूर्णत्वास गेला नाही. एकीकडे सातबाराचे ८0 टक्के काम झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ब-याच ठिकाणचे सातबारा मिळत नाहीत. मिळाले तर चुकीचे मिळतात. भूमिअभिलेखचे तर अजूनही स्कॅनिंगच पूर्ण झाले नाही. त्यामुळे सगळेच मुसळ केरात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सातबारापासून ते फेरफार व इतर सर्वच बाबी आॅनलाईन करण्याचा शासनाचा मानस अजूनही पूर्णत्वास गेला नाही. एकीकडे सातबाराचे ८0 टक्के काम झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ब-याच ठिकाणचे सातबारा मिळत नाहीत. मिळाले तर चुकीचे मिळतात. भूमिअभिलेखचे तर अजूनही स्कॅनिंगच पूर्ण झाले नाही. त्यामुळे सगळेच मुसळ केरात आहे.जिल्ह्यात ई-म्युटेशनचे काम गतीने करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बरीच मेहनत घेतली. हे काम न करणाºया अनेक तलाठ्यांना कारवाईचा झटकाही सोसावा लागला. मात्र त्यानंतर तेथे आलेल्या नव्या तलाठ्यांवरही कारवाईची वेळ येते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकांनी तीन ते चार महिन्यांपासून रजिस्ट्रीसह कागदपत्रे घेवूनही आॅनलाईन फेरफार व सातबाराची कामे केली नसल्याचे दिसून येत आहे. यावर महसूल प्रशासन मात्र काहीच कारवाई करायला तयार नाही. उलट आपल्या कर्मचाºयांच्या चुका झाकून ज्यांचे आॅनलाईन काम व्हायचे आहे, अशांनाच त्रास देण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे.भूमिअभिलेखने जिल्ह्यातील एकूण ४३३३७ मिळकतींच्या डाटा एन्ट्रीचे काम पूर्ण झालेले आहे. मिळकत पत्रिका, आॅनलाईन फेरफाराबाबत युनिकोड कर्न्व्हजन, गोलू क्लिनिंग, डीबीए टू आदी पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्याचा अहवाला भूमिअभिलेख विभागाने दिलेला आहे. तर लावकरच विभागातील संपूर्ण मिळकत पत्रिका महाभूलेख व वेबसाईटवर उपलब्ध होतील, असेही सांगण्यात आले. यामध्ये तहसील, दुय्यम निबंधक, भूमिअभिलेख कार्यालय एकमेकांशी जोडून आॅनलाईन फेरफार पद्धती कार्यान्वित केली जाणार असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात त्याचा अंमल कधी होणार हा मात्र प्रश्नच आहे.ई-मोजणी आज्ञावलीची कामे केवळ शासकीय कामांसाठीच केली जात असल्याचे दिसून येत आहे. यात ५९५ प्रकरणांत मोजणी झाली. तर आणखी शंभराच्या आसपास विविध प्रकरणे भूमिअभिलेख विभागाकडे आल्याचे सांगितले जाते.स्कॅनिंगसाठी नवी कंपनी नेमलीभूअभिलेख विभागाच्या दस्तांचे स्कॅनिंग करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या कंपनीने दीड ते दोन वर्षांत या विभागाला केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देवून छळ मांडला होता. त्यानंतर हे काम करण्यासच असमर्थता दर्शविली. त्यानंतर हे काम आता १ जानेवारी २0१८ पासून पेन इंडिया कंपनी गुडगाव यांना देण्यात आले आहे. जवळपास १00 वर्षांपूर्वीचे जमिनीचे नकाशे, टिपण उतारे, पोटहिस्सा टिपण उतारे आदींचे यात स्कॅनिंग होणार आहे. यात हिंगोलीत १.६९ लाख, कळमनुरीत-१.७९ लाख, वसमतचे १.२१ लाख, औंढ्याचे १.३५ लाख तर सेनगावचे १.0३ लाख असे ७.0९ लाख पानांचे स्कॅनिंग केले जाणार आहे.