शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कृषी सहसंचालकांनी अधिकाऱ्यांना झापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:11 IST

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना चुकांवर बोट ठेवत कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी कृषी सहायक व अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. तसेच या बैठकीला गैरहजर राहणाºया १0 ते १५ जणांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेशही दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना चुकांवर बोट ठेवत कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी कृषी सहायक व अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. तसेच या बैठकीला गैरहजर राहणाºया १0 ते १५ जणांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेशही दिला.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, जि.प.चे कृषी विकास अधिकारी अंकुश डुब्बल, उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे, उपसंचालक लाडके, लोंढे आदींची उपस्थिती होती. कापसावरील बोंडअळी व सोयाबीनवर अळीचा होत असलेला प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर त्यांनी माहिती घेतली.यावेळी अनेक कृषी सहायकांनी दिलेली माहिती व प्रत्यक्ष विचारणा केल्यानंतर सांगितलेल्या बाबींमध्ये मोठी तफावत आढळून येत होती. त्यामुळे जगपात यांनी प्रत्यक्ष भेटी न देताच असे बोगस कामे करीत असाल तर असेच होईल. निरीक्षणाखालील प्लॉटची माहिती नसण्याचे काय कारण असा सवाल केला. त्याचबरोबर गावाची नावेही अहवालात चुकल्याचे समोर आले. ही बाब जुजबी असली तरीही शेतकºयांपर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे. निरीक्षणाखाली असलेल्या प्लॉटच्या शेतमालकाला महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाकडून ५0 टक्के अनुदानावर औषधी देण्यात येत आहे. तिचे वाटप न करता केवळ भाषणे केली अन् फोटो काढल्याचे दिसत असल्याचे म्हणाले. तर जेथे धोक्याच्या पातळीच्या पुढे बोंडअळी पडली तेथे थेट डीबीटी करून खरेदी करा. मात्र त्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करून खरेच वापर झाला की नाही, याची खातरजमा करा. अन्यथा दाखवायचे म्हणून व अनुदान उचलायचे म्हणून हे काम होता कामा नये, अशी तंबीही दिली. अन्यथा पावत्या एवढ्या जमतील की, कापसाचे उत्पादनही तेवढे होणार नाही.या बैठकीसाठी अनेक कृषी सहायक व अधिकारी गैरहजर होते. त्यासाठी कुणी परवानगी दिली होती? असा सवाल करून माझ्या बैठकीला गैरहजर राहायचे तर मीच परवानगी देऊ शकतो. इतरांना काहीच अधिकार नाही. जे गैरहजर आहेत, त्यांचे एक दिवसाचे वेतन कापून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासही त्यांनी सांगितले.बोलतीच बंद : माहिती सांगता येईनाकृषी सहसंचालकांच्या अनुभवी व टोकदार प्रश्नांनी कृषी सहायकच नव्हे, तर अधिकारीही घायाळ होत होते. प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन कामच करायचे हे माहिती नसल्याने अनेकांची तर बोलतीच बंद होत होती. ज्यांनी थोडीफार का हाईना भेटींतून परिस्थिती जाणून घेतली, अशांचेच काय ते ऐकून घेतले जात होते.यामुळे अनेकांची बोबडी वळत असल्याचे चित्र होते. सुरुवातीला खुली असलेली ही बैठक नंतर माध्यमांचे प्रतिनिधी आल्याचे लक्षात येताच गोपनियतेकडे वळली. मात्र तरीही कृषी सहसंचालकांनी अनेक बाबींची चिरफाड केलीच.हिंगोली हा लहान जिल्हा आहे. त्यामुळे येथे चांगले काम करण्यास चांगलाच वाव आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी ही बाब डोळ्यासमोर ठेवून सुधारणा करावी, असा सल्लाही जगताप यांनी दिला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती