हिंगोली : केंद्र सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची माहिती मागूनही ती दिली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. ओबीसीविरोधी केंद्र सरकारच्या निषेधार्थ हिंगोलीतकाँग्रेसच्यावतीने गांधी चौक भागात साडेअकराच्या सुमारास आंदोलन करण्यात आले.
भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आंदोलन करण्यात आले. ओबीसींचा इम्पिरिकल डाटा देण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे पत्राद्वारे मागितली होती. ती अजून दिली गेली नाही. तरीही फडणवीस यावरून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. वारंवार होताहेत अत्याचार, डोळ्यात येतय पाणी, मोदींची अघोषित आणिबाणी अशाप्रकारचे फलक घेवून काँग्रेस कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. यावेळी माजी आ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, सुधीरअप्पा सराफ, बाबा नाईक, विनायक देशमुख, श्यामराव जगताप, विलास गोरे, मुजीब कुरेशी, देशमुख, जहागिरदार, भोसले, बांगर, भगवान खंदारे आदी सहभागी झाले होते.