शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून प्रवाशांच्या मागणीनुसार ‘डेमो’ ही पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. इतर एक्सप्रेस रेल्वेही ...

हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून प्रवाशांच्या मागणीनुसार ‘डेमो’ ही पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. इतर एक्सप्रेस रेल्वेही सुरु आहेत. परंतु, थांबे मात्र वाढलेली नाहीत. प्रवासी संख्या वाढल्यास रेल्वे विभाग थांब्याबाबत निर्णय घेईल, असे स्टेशनमास्टर अलोक यांनी सांगितले.

कोरोना महामारी अजून संपलेली नाही. रोजच्या रोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाआधी सारखी प्रवासी संख्याही सध्या नाही. रोज ५० ते ६० प्रवासी हे प्रवास करताना आढळून येत आहेत. मध्यंतरी पॅसेंजर गाडी नाही म्हणून प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे विभागाने ‘डेमो’ रेल्वे सुरु केली आहे. परंतु, प्रवासी मात्र या ‘डेमो’ गाडीला मिळत नाहीत. रेल्वे विभागाने ज्या ठिकाणी थांबे दिले आहेत त्याच ठिकाणी रेल्वे थांबत आहेत. रेल्वेच्या सुचनेनुसार पुढील बंद असलेले थांबे सुरु होतील.

सध्या सुरु असलेल्या रेल्वे

नरखेड ते काचीगुडा

तितरुपती ते अमरावती

नांदेड ते श्रीनगर

नांदेड ते अमृतसर

इंदोर ते यशवंतपूर

अजमेर ते हैदराबाद

जयपूर ते हैदराबाद

कोल्हापूर ते नागपूर

थांब्याबाबतचा निर्णय रेल्वे विभाग घेणार...

कोरोना काळापासून काही थांबे बंद करण्यात आलेली आहेत. या थांब्याबाबतचा निर्णय प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे विभाग लवकरच घेईल. सध्या तरी एक ‘डेमो’ पॅसेंजर वगळता ९ एक्सप्रेस रेल्वे सुरु आहेत. डेमो रेल्वे सर्व थांब्यावर थांबत आहे.

कोरोना महामारी संपलेली नाही. त्यामुळे प्रवासी संख्या अजून तरी वाढलेली नाही. कोरोनाच्या नियमाबाबत प्रवाशांना वेळोवेळी सूचना दिली जात आहे. थांब्याबाबतचा निर्णय रेल्वे विभागाच्या अखत्यारित आहे.

-अलोक नारायण, रेल्वे स्टेशन मास्टर, हिंगोली

थांबा नसल्याने आम्हाला होतो त्रास...

एक्सप्रेस रेल्वे तर छोट्या थांब्यावर कधीच थांबत नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीचा सहारा घेत शहराच्या ठिकाणी जावे लागते. डेमो रेल्वेही मोजक्याच ठिकाणी थांबत आहे. रेल्वे विभागाने थांब्याबाबत निर्णय घ्यावा, असे प्रवाशांनी सांगितले.

प्रवाशांनी मागणी केल्यामुळे रेल्वे विभागाने ‘डेमो’ रेल्वे सुरु केली आहे. परंतु, मोजक्याच ठिकाणी ‘डेमो’ थांबत आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. याबाबत स्टेशन मास्टरला काही प्रवाशांनी सांगितले. परंतु, महिना झाला अजून त्याचा काही विचार केला नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.