शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आता 'जन आरोग्य' योजनेअंतर्गत म्युकरमायकोसीस आजारावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

२६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित स्वरुपात युनायटेड ...

२६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित स्वरुपात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने १ एप्रिल २०२० पासून राज्यात अंमलात आली आहे.

शासन निर्णयातील सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व लाभार्थींचा विमा निश्चित केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लक्ष व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लक्ष एवढा निधी आधी निश्चित केला आहे. कोरोना रुग्णांना अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये. तसेच महामारीच्या संकटामध्ये सर्व आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी मर्यादित कालावधीसाठी योजनेची व्याप्ती सर्व नागरिकांसाठी वाढविणे तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचाराचा लाभ लाभार्थी रूग्णाबरोबर इतर रुग्णांना देखील मिळावा, हा मुख्य उद्देश आहे.

शासकीय रुग्णालयात करिता राखीव असलेल्या उपचार पद्धती उपलब्ध व्हाव्यात व या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयातील डॉक्टर, इतर कर्मचारी अनुषंगिक कर्मचाऱ्यांना साथरोग प्रतिबंध संदर्भात आवश्यक साधनसामग्री उपलब्ध व्हावी. या दृष्टिकोनातून २३ मे २०२० अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे.सदर योजनेचे ११ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये १ एप्रिल २०२१ ते ३० जून २०२१ कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सर्जिकल पॅकेज ११ व मेडिकल पॅकेज ८ उपलब्ध करून देण्यात आले आहे. म.फुले जन आरोग्य योजनेमध्ये प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लक्ष एवढे विमा संरक्षण आहे. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मध्ये प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लक्ष रुपयांपर्यंत विमा संरक्षण आहे. यापुढे हमी तत्वावर पाच लक्षपर्यंत संरक्षण आहे,असे शासन निर्णयात म्हटले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अनुज्ञेय विमासंरक्षण यापेक्षा अधिक खर्च आल्यास तो खर्च राज्य आरोग्य विमा सोसायटीकडून हमे तत्वावर भागविण्यात येईल. २३ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सदर योजना ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत अंमलात राहील. त्यानंतर याबाबत आढावा घेऊ घेऊन मुदतवाढीचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही शासनाने निर्णयात म्हटले आहे. रूग्णांनी योग्यवेळी, योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी.

- डॉ.इनायतुल्ला अ. खान, जिल्हा साथरोग तज्ञ, हिंगोली.