शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
4
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
5
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
6
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
7
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
8
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
9
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
10
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
12
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
13
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
14
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
15
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
16
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
17
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
18
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
19
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
20
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता नरकयातना असह्य झाल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:06 IST

आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.कळमनुरी तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या करवाडी येथील रस्त्याचा व गावातील सुविधांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. वारंवार निवेदने, आंदोलन व मोर्चे काढूनही या गावातील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे १८ आॅगस्ट रोजी परत करवाडी येथील गावकºयांनी २५ किमी पायी चालत हिंगोली गाठली.सकाळी ९ वाजता निघालेले मोर्चेकरी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हा कचेरीवर धडकले. लेकराबाळांसह, महिला, पुरूष व विद्यार्थी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावाचा संपर्क तुटला होता. ही नित्याचीच बाब आहे. शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मानव विकास बसच माहित नाही. गावात येण्यासाठी रस्ताच नसल्याने करवाडी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे.प्रसूतीदरम्यान गरोदर मातांची होणारी हेळसांड, तसेच गंभीर रूग्णाला बाहेरगावी दवाखान्यात नेण्यासाठी ऐनवेळी रस्त्याअभावी वाहनही उपलब्ध होत नाही. त्यामुळे किती दिवस ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार असे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांनी मोर्च्यादरम्यान उपस्थित केले. करवाडी गावाला रस्ता करून द्यावा, गावात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.न्याय : उच्च न्यायालयाने दखल घेतलीकळमनुरी तालुक्यातील करवाडी गावच्या रस्त्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सु-मुटो याचिका दाखल केली. जिल्हा प्रशासनाकडूनही करवाडी रस्त्याबाबत खुलासा मागविला होता. परंतु याबाबत अद्याप जि. प. व जिल्हा प्रशासनाने कुठलीही कार्यवाहीकेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. परत शिनिवारी जिल्हाधिकाºयांना करवाडी येथील रस्ता व गावातील सुविधा याबाबत निवेदन सादर केले आहे. जि.प.लाही निवेदन सादर केले आहे, असे भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी सांगितले.रस्त्याअभावी करवाडीत रूग्णवाहिका येत नाहीत. ना खाजगी वाहने येण्यास तयार होतात. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ रोजी गरोदर मातेला खाटेवर ३ किमी प्रवास करावा लागला. हा नेहमीचाच प्रक्रार असल्याचे गावकरी सांगत होते.पायी गाठली हिंगोली४रस्त्याच्या मागणीसाठी करवाडी येथील आदिवासी समाजबांधव लहान-मुलांबाळासह करवारी ते हिंगोली पायी चालत आले. २५ किमी. अंतर पार करत मोर्चेकरी जिल्हा कचेरीसमोर जमले. यावेळी संघटनेतर्फेच मोर्चात सहभागी झालेल्यांना खिचडी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा