शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

आता नरकयातना असह्य झाल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:06 IST

आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.कळमनुरी तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या करवाडी येथील रस्त्याचा व गावातील सुविधांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. वारंवार निवेदने, आंदोलन व मोर्चे काढूनही या गावातील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे १८ आॅगस्ट रोजी परत करवाडी येथील गावकºयांनी २५ किमी पायी चालत हिंगोली गाठली.सकाळी ९ वाजता निघालेले मोर्चेकरी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हा कचेरीवर धडकले. लेकराबाळांसह, महिला, पुरूष व विद्यार्थी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावाचा संपर्क तुटला होता. ही नित्याचीच बाब आहे. शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मानव विकास बसच माहित नाही. गावात येण्यासाठी रस्ताच नसल्याने करवाडी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे.प्रसूतीदरम्यान गरोदर मातांची होणारी हेळसांड, तसेच गंभीर रूग्णाला बाहेरगावी दवाखान्यात नेण्यासाठी ऐनवेळी रस्त्याअभावी वाहनही उपलब्ध होत नाही. त्यामुळे किती दिवस ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार असे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांनी मोर्च्यादरम्यान उपस्थित केले. करवाडी गावाला रस्ता करून द्यावा, गावात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.न्याय : उच्च न्यायालयाने दखल घेतलीकळमनुरी तालुक्यातील करवाडी गावच्या रस्त्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सु-मुटो याचिका दाखल केली. जिल्हा प्रशासनाकडूनही करवाडी रस्त्याबाबत खुलासा मागविला होता. परंतु याबाबत अद्याप जि. प. व जिल्हा प्रशासनाने कुठलीही कार्यवाहीकेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. परत शिनिवारी जिल्हाधिकाºयांना करवाडी येथील रस्ता व गावातील सुविधा याबाबत निवेदन सादर केले आहे. जि.प.लाही निवेदन सादर केले आहे, असे भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी सांगितले.रस्त्याअभावी करवाडीत रूग्णवाहिका येत नाहीत. ना खाजगी वाहने येण्यास तयार होतात. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ रोजी गरोदर मातेला खाटेवर ३ किमी प्रवास करावा लागला. हा नेहमीचाच प्रक्रार असल्याचे गावकरी सांगत होते.पायी गाठली हिंगोली४रस्त्याच्या मागणीसाठी करवाडी येथील आदिवासी समाजबांधव लहान-मुलांबाळासह करवारी ते हिंगोली पायी चालत आले. २५ किमी. अंतर पार करत मोर्चेकरी जिल्हा कचेरीसमोर जमले. यावेळी संघटनेतर्फेच मोर्चात सहभागी झालेल्यांना खिचडी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा