शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

हिंगोलीत सर्वसाधारण वजनांचीच बाळे : जिल्ह्यात लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:29 IST

हिंगोली : सर्वसाधरण ४ किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्मला आल्यास, असे बाळ लठ्ठ समजले जाते. लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे ...

हिंगोली : सर्वसाधरण ४ किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्मला आल्यास, असे बाळ लठ्ठ समजले जाते. लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण मोठ्या शहरात जास्त असले तरी हिंगोलीसारख्या भागात सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचीच बाळे जन्माला येतात. ४ किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचे बाळ जन्माला येते. मात्र, मागील काही वर्षांत लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातही मोठ्या शहरांमध्ये ४ व त्यापेक्षा जास्त वजनाची बाळे जन्माला येत आहेत. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन वर्षांत ९ हजार ३७० बाळे जन्माला आली आहेत. यात ४ किलो वजनाच्या केवळ एक-दोन बाळांचाच समावेश आहे. २.५० किलो वजनापेक्षा कमी वजनाचे बाळ जन्मल्यास अशा बाळाला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाते. अशक्त माता, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते, तसेच जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यासही अशा बाळासह मातेला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. ग्रामीण भागात जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यास, असे बाळ सुदृढ बाळ समजले जाते. मात्र, मातेला शुगरसह इतर काही आजार असल्यास ४ किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

पाच किलोपेक्षा जास्त वजनाच्या बाळाचे प्रमाण शून्य

जिल्ह्यात सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचीच बाळे जन्माला आली आहेत. वर्षभरात केवळ एकाच बाळाचे वजन ४ किलो भरले आहे. त्यानंतर ३ किलो ९०० ग्रॅम वजनाचे बाळ जन्माला आलेले आहे. मोठ्या शहरात ५ किलो वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण असले तरी हिंगोलीसारख्या भागात जास्तीत जास्त ४ किलोपर्यंत बाळाचे वजन भरत आहे. ५ किलो वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण शून्य आहे.

कारण काय

एखाद्या मातेला शुगर व इतर आजार असतील, तर अशा मातेच्या नवजात बाळाचे वजन जास्त असते, तसेच एखाद्या मातेची अकाली प्रसूती, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास, अशा मातेच्या नवजात बाळाचे वजन शक्यतो कमी भरते. जास्त वजन व कमी वजनाच्या बाळावर लक्ष ठेवावे लागते.

-डॉ. दीपक मोरे,

नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय हिंगोली