शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास

By विजय पाटील | Updated: July 25, 2023 18:16 IST

मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली.

हिंगोली : शहरातील फुलमंडी भागातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने २५ जुलै रोजी पुन्हा हाती घेतली आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हिंगोली नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली होती. त्यातच रस्त्यावर हातगाडे, फलक लावणाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांना हातगाड्यांच्या अतिक्रमणांनी घेरले आहे. रस्त्यालगत चिखल होत असल्याने काहींनी आपले बस्तान थेट रस्त्यावर आणले आहे. आधीच वाहतूक नियमांची एैसी तैशी करणाऱ्या हिंगोलीकरांचे यामुळे चांगलेच फावत आहे. अगदी उद्यानात पायी फिरत असल्यासारखे हातगाडे फिरवितात. त्यामुळे नागरिक वाहनांच्या वाहतुकीची शिस्त मोडतात. या सर्व प्रकाराकडे लक्ष देत न.प. व वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम उघडणे गरजेचे आहे.

हिंगोलीत २५ जुलै रोजी फुलमंडी भागातील अतिक्रमण नगरपालिकेच्या पथकाने हटविले आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या काही गल्ल्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यात काही जणांच्या पक्क्या दुकानांना धक्का बसला आहे. मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण