शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

आता कोणीच राहणार नाही उपाशी; केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

हिंगोली : कोरोनामुळे मजूर, कामगारांसह मध्यम वर्गीयांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनही विस्कटले आहे. शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना ...

हिंगोली : कोरोनामुळे मजूर, कामगारांसह मध्यम वर्गीयांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनही विस्कटले आहे. शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना मोफत धान्य देण्यात येत असले तरी केशरी कार्डधारकांना दिलासा मिळाला नव्हता. आता केशरी कार्डधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५४ हजार ६९६ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे ते ऑगस्ट २०२० या चार महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. मात्र, काही लाभार्थ्यांनी अन्नधान्याची उचल केली नसल्याने या योजनेतील काही अन्नधान्य शिल्लक उरले आहे. त्यामुळे शासकीय गोदामामध्ये तसेच रास्त भाव दुकानामध्ये हे धान्य शिल्लक राहिले आहे. आता शिल्लक राहिलेले गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून २०२१ साठी प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात गहू ८ रुपये तर तांदूळ १२ रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गरजू लाभार्थींना कोरोना काळात दिलासा मिळण्यास मदत मिळणार आहे.

बीपीएलच्या २६३५९ कार्डधारकांना लाभ

१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीपीएल कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२) त्यानुसार जिल्ह्यात रेशन दुकानांवर अन्नधान्य घेण्यासाठी लाभार्थी गर्दी करीत आहेत.

३) आतापर्यंत नेमके किती लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप झाले, याचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाकडे आला नसला तरी एकही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना प्रथम रेशन

शासनाने केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथम धान्य देण्यात येणार आहे. धान्य वाटप करण्यापूर्वी अन्नधान्याची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच दुकानात नोंदवही ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा कोट

शासनाच्या निर्देशानुसार केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दरात प्रति लाभार्थी १ किलो गहू व १ किलो तांदूळ देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात ६८.९०० मेट्रिक टन अन्नधान्य उपलब्ध आहे.

- अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक - १८८८७३

अंत्योदय - २६३५९

अन्नसुरक्षा - १३१८३८

शेतकरी - ३०७७६