शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

आता कोणीच राहणार नाही उपाशी; केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

हिंगोली : कोरोनामुळे मजूर, कामगारांसह मध्यम वर्गीयांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनही विस्कटले आहे. शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना ...

हिंगोली : कोरोनामुळे मजूर, कामगारांसह मध्यम वर्गीयांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनही विस्कटले आहे. शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना मोफत धान्य देण्यात येत असले तरी केशरी कार्डधारकांना दिलासा मिळाला नव्हता. आता केशरी कार्डधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५४ हजार ६९६ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे ते ऑगस्ट २०२० या चार महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. मात्र, काही लाभार्थ्यांनी अन्नधान्याची उचल केली नसल्याने या योजनेतील काही अन्नधान्य शिल्लक उरले आहे. त्यामुळे शासकीय गोदामामध्ये तसेच रास्त भाव दुकानामध्ये हे धान्य शिल्लक राहिले आहे. आता शिल्लक राहिलेले गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून २०२१ साठी प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात गहू ८ रुपये तर तांदूळ १२ रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गरजू लाभार्थींना कोरोना काळात दिलासा मिळण्यास मदत मिळणार आहे.

बीपीएलच्या २६३५९ कार्डधारकांना लाभ

१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीपीएल कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२) त्यानुसार जिल्ह्यात रेशन दुकानांवर अन्नधान्य घेण्यासाठी लाभार्थी गर्दी करीत आहेत.

३) आतापर्यंत नेमके किती लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप झाले, याचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाकडे आला नसला तरी एकही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना प्रथम रेशन

शासनाने केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथम धान्य देण्यात येणार आहे. धान्य वाटप करण्यापूर्वी अन्नधान्याची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच दुकानात नोंदवही ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा कोट

शासनाच्या निर्देशानुसार केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दरात प्रति लाभार्थी १ किलो गहू व १ किलो तांदूळ देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात ६८.९०० मेट्रिक टन अन्नधान्य उपलब्ध आहे.

- अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक - १८८८७३

अंत्योदय - २६३५९

अन्नसुरक्षा - १३१८३८

शेतकरी - ३०७७६