शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

खरीपातील भरपाईचा पत्ता नाही; रबीसाठी पीकविम्याकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 13:53 IST

हिंगोली जिल्ह्यात यंदा रबीच्या ७२ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

ठळक मुद्दे१५ डिसेंबर ही विमा काढण्याची अंतिम मुदत आहे. यंदा अवघ्या सहा हजार शेतकऱ्यांनी विमा काढला.

हिंगोली : जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही अनेकांना अजून विमा मिळाला नाही. अर्ज फाटे करूनही काहीच फायदा होत नसल्याची भावना शेतकऱ्यांची झाल्याने रबी हंगामासाठी विमा काढण्याकडे फारसा कल दिसत नाही. यंदा अवघ्या ६०७० शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढला आहे. 

हिंगोली जिल्ह्यात यंदा रबीच्या ७२ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात अजूनही वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत शेतकरी पीक विमा काढताना दिसत नाहीत. १५ डिसेंबर ही विमा काढण्याची अंतिम मुदत आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांची यासाठी लगबग दिसत नाही. दुसरीकडे विमा कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरिपातील नुकसानीच्या पीक कापणी प्रयोगानुसारच्या व प्रत्यक्ष पाहणीतील अहवालानुसार विम्याच्या वाटपासाठी काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही विमा मिळेल, याचा विश्वास दिसत नसल्याने शेतकरी विमा काढण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा अवघ्या सहा हजार शेतकऱ्यांनी विमा काढला.

खरीप नुकसानीचे अनुदानहिंगोली जिल्ह्याला खरीप नुकसानीच्या अनुदानाचा पहिला टप्पा ११२ कोटी रुपयांचा प्राप्त झाला आहे. शासनाने दिलेल्या या रकमेचे वितरण करण्यासाठी हा हप्ता तालुका स्तरावर जिल्हा प्रशासनाने वितरितही केला आहे. आता हळूहळू इतर कामांतून वेळ मिळत असल्याने महसूलचे अधिकारी व कर्मचारी या अनुदानाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करीत आहेत. मात्र त्याची गती मंद असल्याचे दिसत आहे.

विमा नशिबाचाच खेळमी पूर्वी पीक विमा काढायचो . मात्र नुकसान झाल्यावर मिळत नाही. नाही झाले तरीही मिळते, असे दिसले. हा नशिबाचाच खेळ झाला. वस्तुनिष्ठता नाही. हे असेच दरवर्षी घडते. त्यामुळे यंदा साडेपाच एकर गहू व टाळकी असूनही पीक विमा काढला नाही.  त्यावर फारसा विश्वासच राहिला नाही. - सदाशिव तारे, सवड

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrop Loanपीक कर्ज