शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

खरीपातील भरपाईचा पत्ता नाही; रबीसाठी पीकविम्याकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 13:53 IST

हिंगोली जिल्ह्यात यंदा रबीच्या ७२ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

ठळक मुद्दे१५ डिसेंबर ही विमा काढण्याची अंतिम मुदत आहे. यंदा अवघ्या सहा हजार शेतकऱ्यांनी विमा काढला.

हिंगोली : जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही अनेकांना अजून विमा मिळाला नाही. अर्ज फाटे करूनही काहीच फायदा होत नसल्याची भावना शेतकऱ्यांची झाल्याने रबी हंगामासाठी विमा काढण्याकडे फारसा कल दिसत नाही. यंदा अवघ्या ६०७० शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढला आहे. 

हिंगोली जिल्ह्यात यंदा रबीच्या ७२ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात अजूनही वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत शेतकरी पीक विमा काढताना दिसत नाहीत. १५ डिसेंबर ही विमा काढण्याची अंतिम मुदत आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांची यासाठी लगबग दिसत नाही. दुसरीकडे विमा कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरिपातील नुकसानीच्या पीक कापणी प्रयोगानुसारच्या व प्रत्यक्ष पाहणीतील अहवालानुसार विम्याच्या वाटपासाठी काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही विमा मिळेल, याचा विश्वास दिसत नसल्याने शेतकरी विमा काढण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा अवघ्या सहा हजार शेतकऱ्यांनी विमा काढला.

खरीप नुकसानीचे अनुदानहिंगोली जिल्ह्याला खरीप नुकसानीच्या अनुदानाचा पहिला टप्पा ११२ कोटी रुपयांचा प्राप्त झाला आहे. शासनाने दिलेल्या या रकमेचे वितरण करण्यासाठी हा हप्ता तालुका स्तरावर जिल्हा प्रशासनाने वितरितही केला आहे. आता हळूहळू इतर कामांतून वेळ मिळत असल्याने महसूलचे अधिकारी व कर्मचारी या अनुदानाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करीत आहेत. मात्र त्याची गती मंद असल्याचे दिसत आहे.

विमा नशिबाचाच खेळमी पूर्वी पीक विमा काढायचो . मात्र नुकसान झाल्यावर मिळत नाही. नाही झाले तरीही मिळते, असे दिसले. हा नशिबाचाच खेळ झाला. वस्तुनिष्ठता नाही. हे असेच दरवर्षी घडते. त्यामुळे यंदा साडेपाच एकर गहू व टाळकी असूनही पीक विमा काढला नाही.  त्यावर फारसा विश्वासच राहिला नाही. - सदाशिव तारे, सवड

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrop Loanपीक कर्ज