शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

राष्ट्रीय महामार्गांचा जिल्ह्याबाहेरून कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:51 IST

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची तुकडे पाडून सहा कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांची कार्यालये जिल्ह्याबाहेर आहेत. तर दर्जावरून निर्माण होणा-या प्रश्नाला उत्तर देणारा कोणी येथे भेटत नसल्याने अडचण होत असून निदान येथे उपविभाग तरी द्यावा, अशी हिंगोलीकरांची रास्त अपेक्षा आहे.

विजय पाटील।हिंगोली : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची तुकडे पाडून सहा कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांची कार्यालये जिल्ह्याबाहेर आहेत. तर दर्जावरून निर्माण होणा-या प्रश्नाला उत्तर देणारा कोणी येथे भेटत नसल्याने अडचण होत असून निदान येथे उपविभाग तरी द्यावा, अशी हिंगोलीकरांची रास्त अपेक्षा आहे.जिल्ह्यातून जाणाºया काही राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. तर काहींचे अजूनही भूसंपादनच सुरू आहे. काहींचे हे कामही अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय महामार्ग १६१ लोहा-वारंगा-कनेरगावचे काम सुरू होणार आहे. मात्र हा मार्ग अकोला व नांदेडच्या विभागांमध्ये वाटल्या गेला. हिंगोलीकरांना दोन्हींकडूनही टोलवाटोलवीच सोसावी लागते. राष्ट्रीय महामार्ग ३६१ वारंगा-महागाव याचेही काम सुरू आहे. त्यावरही नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नांदेडहून काम पाहते. तक्रारी झाल्याच तर त्या सोडवायच्या कशा? हा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्ग २२२ परभणी-हिंगोली चे काम सुरू आहे. तर राष्ट्रीय महामार्ग ७५२, राष्ट्रीय महामार्ग ४६१ ब. नरर्सी नामदेव-सेनगावच्या भूसंपादनाची प्रक्रियाच बाकी असताना कामही सुरू झाले अन् ते वादात सापडून बंदही पडले. जिल्हा प्रशासन केवळ एक जुजबी नोटीस देवून मोकळे झाले. आता भूसंपादन प्रस्ताव आला.जिल्ह्यातील मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गामार्फत होणार आहेत. त्यांची कामेही योग्य दर्जाची होणे अपेक्षित आहे.त्यासाठी त्यांचा विभाग नव्हे, निदान उपविभाग हिंगोलीतच असला तर त्यांच्या चुकावर लागलीच बोट ठेवून दुरुस्ती करणे शक्य होईल. अन्यथा ही कामे झाल्यावर पुन्हा दुरुस्तीलाही निधी मिळणार नाही अन् पूर्वीपेक्षाही वाईट अवस्था झाली तर कोणी दखलही घेणार नाही.जिल्हा प्रशासनालाही स्थानिक ठिकाणी असलेल्या यंत्रणेकडून आढावा घेण्यासह कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करणे सोपे जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले तर हे काही अवघड काम नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक