शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

खाटारवरच नेला स्मशानभूमित ‘मृतदेह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:11 IST

नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यापुर्वीच गावाचे पुर्नवसन करा किंवा रस्ता देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी मागणी करूनही न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त केली.औंढा नगरपंचायत अंतर्गत प्रभाग २ मध्ये काजीदरा तांड्याचा समावेश आहे. येथील विलास राठोड यांची पत्नी सुभद्रा विलास राठोड (१९) यांना तापीचा आजार जडल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु रविवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. नांदेड येथून पार्थिव औंढा-हिंगोली रोडवर आणले. गावामध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मृतदेह चक्क खाटेवर टाकून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. जो रस्ता आहे तो खाजगी मालकीचा असून केवळ पाऊलवाटच आहे. पावसाचे दिवस आहेत. रस्त्यावर चिखल झाल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. सदर महिलेला दवाखान्यात घेऊन जाताना देखील खाटावरच नेण्यात आले होते. वेळीच उपचार झाले असते तर महिलेचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया उपसभापती मोतीराम राठोड यांनी दिली. याच गावातून दहा दिवसांपुर्वी रंजना पवार या गरोदर मातेस प्रसुतीसाठी रस्ता नसल्याने पाठीवर घेऊन रुग्णालयात दाखल केले होते. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. रस्त्याअभावी आतापर्यंत पाच जणांना प्राणास मुकावे लागल्याचे राठोड म्हणाले. तांड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णालयात तसेच इतर कामासाठी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर येथील ग्रामस्थांना पाऊल वाटच आहे. औंढा- हिंगोली या रस्त्यापासून तांड्याला जाणारे आंतर हे अर्धा कि.मी. पेक्षा जास्त आहे. हा रस्ता खाजगी मालकीच्या शेतामधूनच जातो. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी खा. राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफे यांच्याकडे मागणी केली. त्यांनीही रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याचे मान्य केले; परंतु काही खाजगी शेतकरी रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार नसल्याने या तांड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तांड्यात येण्यासाठी औंढा शहरापासून दर्गा मार्गे आंजनवाडा हा जुना पाणंद रस्ता आहे. परंतु तोही थेट गावात पोहचत नाही. याच तांड्यातील मोतीराम राठोड या हे न.प.वर सदस्य म्हणून निवडून गेले. शिवाय ते उपसभापती देखील होते. त्यांनी व ग्रामस्थांनी रस्ता द्या किंवा तांड्याचे पुणर्वसन करा या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. न.प.मुख्याधिकाºयांनी दखल घेत रस्त्याच्या जमिनीचा भुसंपादनाची तयारी दाखविली व तसे लेखी पत्र गावकºयांना दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrimeगुन्हा