शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

खाटारवरच नेला स्मशानभूमित ‘मृतदेह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:11 IST

नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यापुर्वीच गावाचे पुर्नवसन करा किंवा रस्ता देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी मागणी करूनही न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त केली.औंढा नगरपंचायत अंतर्गत प्रभाग २ मध्ये काजीदरा तांड्याचा समावेश आहे. येथील विलास राठोड यांची पत्नी सुभद्रा विलास राठोड (१९) यांना तापीचा आजार जडल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु रविवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. नांदेड येथून पार्थिव औंढा-हिंगोली रोडवर आणले. गावामध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मृतदेह चक्क खाटेवर टाकून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. जो रस्ता आहे तो खाजगी मालकीचा असून केवळ पाऊलवाटच आहे. पावसाचे दिवस आहेत. रस्त्यावर चिखल झाल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. सदर महिलेला दवाखान्यात घेऊन जाताना देखील खाटावरच नेण्यात आले होते. वेळीच उपचार झाले असते तर महिलेचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया उपसभापती मोतीराम राठोड यांनी दिली. याच गावातून दहा दिवसांपुर्वी रंजना पवार या गरोदर मातेस प्रसुतीसाठी रस्ता नसल्याने पाठीवर घेऊन रुग्णालयात दाखल केले होते. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. रस्त्याअभावी आतापर्यंत पाच जणांना प्राणास मुकावे लागल्याचे राठोड म्हणाले. तांड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णालयात तसेच इतर कामासाठी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर येथील ग्रामस्थांना पाऊल वाटच आहे. औंढा- हिंगोली या रस्त्यापासून तांड्याला जाणारे आंतर हे अर्धा कि.मी. पेक्षा जास्त आहे. हा रस्ता खाजगी मालकीच्या शेतामधूनच जातो. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी खा. राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफे यांच्याकडे मागणी केली. त्यांनीही रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याचे मान्य केले; परंतु काही खाजगी शेतकरी रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार नसल्याने या तांड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तांड्यात येण्यासाठी औंढा शहरापासून दर्गा मार्गे आंजनवाडा हा जुना पाणंद रस्ता आहे. परंतु तोही थेट गावात पोहचत नाही. याच तांड्यातील मोतीराम राठोड या हे न.प.वर सदस्य म्हणून निवडून गेले. शिवाय ते उपसभापती देखील होते. त्यांनी व ग्रामस्थांनी रस्ता द्या किंवा तांड्याचे पुणर्वसन करा या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. न.प.मुख्याधिकाºयांनी दखल घेत रस्त्याच्या जमिनीचा भुसंपादनाची तयारी दाखविली व तसे लेखी पत्र गावकºयांना दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrimeगुन्हा