शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

खाटारवरच नेला स्मशानभूमित ‘मृतदेह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:11 IST

नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यापुर्वीच गावाचे पुर्नवसन करा किंवा रस्ता देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी मागणी करूनही न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त केली.औंढा नगरपंचायत अंतर्गत प्रभाग २ मध्ये काजीदरा तांड्याचा समावेश आहे. येथील विलास राठोड यांची पत्नी सुभद्रा विलास राठोड (१९) यांना तापीचा आजार जडल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु रविवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. नांदेड येथून पार्थिव औंढा-हिंगोली रोडवर आणले. गावामध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मृतदेह चक्क खाटेवर टाकून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. जो रस्ता आहे तो खाजगी मालकीचा असून केवळ पाऊलवाटच आहे. पावसाचे दिवस आहेत. रस्त्यावर चिखल झाल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. सदर महिलेला दवाखान्यात घेऊन जाताना देखील खाटावरच नेण्यात आले होते. वेळीच उपचार झाले असते तर महिलेचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया उपसभापती मोतीराम राठोड यांनी दिली. याच गावातून दहा दिवसांपुर्वी रंजना पवार या गरोदर मातेस प्रसुतीसाठी रस्ता नसल्याने पाठीवर घेऊन रुग्णालयात दाखल केले होते. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. रस्त्याअभावी आतापर्यंत पाच जणांना प्राणास मुकावे लागल्याचे राठोड म्हणाले. तांड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णालयात तसेच इतर कामासाठी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर येथील ग्रामस्थांना पाऊल वाटच आहे. औंढा- हिंगोली या रस्त्यापासून तांड्याला जाणारे आंतर हे अर्धा कि.मी. पेक्षा जास्त आहे. हा रस्ता खाजगी मालकीच्या शेतामधूनच जातो. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी खा. राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफे यांच्याकडे मागणी केली. त्यांनीही रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याचे मान्य केले; परंतु काही खाजगी शेतकरी रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार नसल्याने या तांड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तांड्यात येण्यासाठी औंढा शहरापासून दर्गा मार्गे आंजनवाडा हा जुना पाणंद रस्ता आहे. परंतु तोही थेट गावात पोहचत नाही. याच तांड्यातील मोतीराम राठोड या हे न.प.वर सदस्य म्हणून निवडून गेले. शिवाय ते उपसभापती देखील होते. त्यांनी व ग्रामस्थांनी रस्ता द्या किंवा तांड्याचे पुणर्वसन करा या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. न.प.मुख्याधिकाºयांनी दखल घेत रस्त्याच्या जमिनीचा भुसंपादनाची तयारी दाखविली व तसे लेखी पत्र गावकºयांना दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrimeगुन्हा