शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

नांदेड, परभणीने वाढविली जिल्ह्याची चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी लागू केली असून, आगारातून सुटणाऱ्या बसेसही बंद करण्याचे आदेश ...

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी लागू केली असून, आगारातून सुटणाऱ्या बसेसही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या बसेस अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मृतांची संख्याही दोन आकडी झाली आहे. शेजारच्या परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाने हिंगोली जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान टाळेबंदी घोषित केली आहे. यापूर्वी १ ते ७ मार्चदरम्यान टाळेबंदी घोषित केली होती. दोन्ही वेळेस तिन्ही आगारांतून सुटणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परंतु या दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या बसेस चालूच होत्या. पहिल्या टाळेबंदीला परजिल्ह्यातून येणारी बस बसस्थानकात येत होती. पण, आजघडीला येत नाही. बसस्थानकावर येण्याऐवजी शहरातील थांब्यावर या बसेस बिनधास्तपणे थांबत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.