शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

‘नाफेड’ला माल मिळेना ! हमीदरापेक्षा बाजारात अधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:11 IST

 बाजारात अधिक दर मिळत असल्याने 'नाफेड' ला नकार

ठळक मुद्देशेतकऱ्यांची माल विक्रीस नकारघंटासहाही खरेदी केंद्रांवर शेतकरी फिरकेनासे झाले आहेत.

हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने मूग आणि उडीद खरेदीकरिता १५ सप्टेंबरपासून; तर सोयाबीनसाठी १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्यक्षात मात्र हमीदरापेक्षा बाजारात शेतमालाला अधिक दर मिळत असल्याने व उडीद, मूगाच्या उत्पन्नात विक्रमी घट झाल्याने 'नाफेड'ला शेतमाल देण्यास शेतकऱ्यांमधून नकार दर्शविण्यात येत आहे. परिणामी, जिल्ह्यातील सहाही खरेदी केंद्रांवर शेतकरी फिरकेनासे झाले आहेत.

जिल्ह्यात दरवर्षीच्या खरीप हंगामात अन्य पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक असते. त्याखालोखाल कापूस, मूग, उडीद या पिकांचे प्रमाणही बऱ्यापैकी असते.  पिके ऐन भरात असतानाच अधूनमधून झालेल्या अतिवृष्टीमुळे व उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने सुमारे १ लाख ५३ हजार हेक्टरवरील पिके नेस्तनाबूत झाली असून नुकसानीच्या पंचनाम्यांची कामे सध्या सुरू आहेत. या नैसर्गिक संकटामुळे मूग आणि उडीद या पिकांच्या सरासरी उत्पन्नात विक्रमी घट झाली असून सोयाबीनचा एकरी अ‍ॅव्हरेजही घसरले.  दुसरीकडे नाफेडच्या तुलनेत सोयाबीन, उडीद व मूग या शेतमालास अधिक दर मिळत आहे. या कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'नाफेड'च्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, साखरा आणि जवळा येथे नाफेडची खरेदी केंद्र आहेत. त्यात केंद्र शासनाच्या दराप्रमाणे खरेदी होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीHingoliहिंगोली