शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लोकसहभागातून काढला गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:37 IST

जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतून १ लाख ३१ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतून १ लाख ३१ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.जलयुक्त शिवार अभियानात निवड केलेल्या गावांत होत असलेल्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनाही आहेत. सेनगाव येथे जि. प. लघुसिंचन विभाग ६, सिंचन व्यवस्थापन २ अशी ८ कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच कळमनुरी सिंचन व्यवस्थापन उप विभाग २, व जि. प. लघुसिंचन ४ अशी ६ कामे तर हिंगोली तालुक्यात पशुपैदास विभागाकडून १ तर सिंचन व्यवस्थापन विभागाकडून २ अशी एकुण ३ कामे चालु आहेत. औंढा तालुक्यात जि. प. लघुसिंचन विभागाकडून १ तर सिंचन व्यवस्थापकाकडून १ अशी एकुण २ एकूण २० कामे हाती घेतली आहेत.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे. हिंगोली तालुक्यात ३ कामे सुरू असून लोकसहभागातून २७ मार्च पर्यंत ९ हजार ३९४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. कळमनुरीत दोन कामे सुरू असून २१ हजार ६३० घनमीटर गाळ काढण्यात आला. तसेच सेनगावात दोन कामे असून ९७ हजार ७९७ घनमीटर गाळ तर औंढा नागनाथ येथे दोन कामे असून २ हजार २०५ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. गाळामुळे शेतकºयांच्या जमिनी सुपीक होण्यास मदत होत आहे. शिवाय अभियानाला लोकसहभागाचे बळ मिळत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDamधरण