शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लोकसहभागातून काढला गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:37 IST

जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतून १ लाख ३१ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतून १ लाख ३१ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.जलयुक्त शिवार अभियानात निवड केलेल्या गावांत होत असलेल्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनाही आहेत. सेनगाव येथे जि. प. लघुसिंचन विभाग ६, सिंचन व्यवस्थापन २ अशी ८ कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच कळमनुरी सिंचन व्यवस्थापन उप विभाग २, व जि. प. लघुसिंचन ४ अशी ६ कामे तर हिंगोली तालुक्यात पशुपैदास विभागाकडून १ तर सिंचन व्यवस्थापन विभागाकडून २ अशी एकुण ३ कामे चालु आहेत. औंढा तालुक्यात जि. प. लघुसिंचन विभागाकडून १ तर सिंचन व्यवस्थापकाकडून १ अशी एकुण २ एकूण २० कामे हाती घेतली आहेत.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे. हिंगोली तालुक्यात ३ कामे सुरू असून लोकसहभागातून २७ मार्च पर्यंत ९ हजार ३९४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. कळमनुरीत दोन कामे सुरू असून २१ हजार ६३० घनमीटर गाळ काढण्यात आला. तसेच सेनगावात दोन कामे असून ९७ हजार ७९७ घनमीटर गाळ तर औंढा नागनाथ येथे दोन कामे असून २ हजार २०५ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. गाळामुळे शेतकºयांच्या जमिनी सुपीक होण्यास मदत होत आहे. शिवाय अभियानाला लोकसहभागाचे बळ मिळत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDamधरण