शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोतवाल संघटनेतर्फे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:16 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले.मागील महिनाभरापासून कोतवाल संघटनेतर्फे कामबंद आंदोलन चालू आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालायासमोरही धरणे आंदोलन सुरू आहे. परंतु आजपर्यंत शासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. कोतवालांना शासनाकडून दिले जाणारे मानधन तुटपुंजी असून या मानधनाच्या आधारे संसाराचा गाडा हाकणे कठीण आहे. शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये कोतवाल कामे करीत आहे. परंतु या कामांचा योग्य मोबदला शासनाकडून मिळत नाही. केवळ पाच हजार दहा रुपयांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीन झाले आहे. शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, परंतु ठोस निर्णय मात्र घेतला जात नाही. तसेच आंदोलनाची दखलही शासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे संघटनेतर्फे आंदोलन केले जात आहे. तसेच जी मागणी निजामकालीन आहे, त्याविषयी जोपर्यंत कॅबिनेटमध्ये कोतवालांना चतुर्थश्रेणीचा निर्णय लागू होत नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहिल. असा निर्णय कोतवाल संघटनेने घेतला आहे. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत शासनाने कुठलाही निर्णय न दिल्यास मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषण करण्यात येणार आहे. कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, सेवानिवृत्त सेवकांना पेन्शन, प्रवास भत्ता यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कोतवाल सहभागी झाले आहेत. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नायब तहसीलदार बोथीकर आदींनी आंदोलकांची भेट घेतली. प्रशासनास दिलेल्या निवेदनावर संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष बाळू नागरे, विजय चांदणे यांच्यासह कोतवालांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMorchaमोर्चा