शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह सासूही भांडली, २ दिवस उपाशी ठेवलं; संतापलेल्या जावयाने सासूला संपवलं

By रमेश वाबळे | Updated: April 18, 2023 16:39 IST

दारूच्या व्यसनामुळे पत्नी आणि सासूसोबत होत असत भांडण

आखाडा बाळापूर : जावयाचे मुलीसोबत भांडण सुरू असताना सासूही घालून-पाडून बोलत असल्याने जावयाने शेळ्या बांधायचा खुंटा उपटून सासूच्या डोक्यात घातला. दारूच्या नशेत त्याने तिला ठार मारले. पत्नीलाही मारहाण करून स्वत:च्या मुलीचाही हात मुरगाळल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

आखाडा बाळापूर येथील शेवाळा रोड परिसरात राहणाऱ्या लताबाई नागराव खिल्लारे (वय ५५ वर्षे) यांच्याकडेच त्यांची मुलगी अर्चना व जावई अजय रमेश सोनवणे (वय २७) राहत होता. सासूरवाडीत वास्तव्य व आखाडा बाळापूरच्या बाजारपेठेत हमालीचे काम करून तो उपजीविका करत होता. पत्नी अर्चनासोबत राहताना दोन मुली, एक मुलगा अशा परिवारासह संसार सुरू असताना अजयला दारूचे व्यसन जडले. यावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. १६ एप्रिलला दुपारी २ वाजता तो दारू पिऊन घरी आला. जेवण वाढण्याच्या कारणावरून अर्चनाशी त्याचा वाद झाला. तेव्हा मुलीची बाजू घेत लताबाई खिल्लारे यांनी अजयला घालून पाडून बोलत राग व्यक्त केला. मात्र अजयही संतापला. शेळीला बांधण्यासाठी लावलेला खुटा उपटून त्याने सासूच्या डोक्यात घातला. बायकोलाही मारले. मुलीचाही हात मुरगाळला. सासू रक्तबंबाळ अवस्थेत पडली. शेजारच्यांनी तिला बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार गंभीर होता, असे उपस्थितांनी सांगितले. प्रथमोपचार करून नांदेडला पाठविले. परंतु त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मावळली.

जावयाला केली अटकघटनेची माहिती होताच ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे आदी घटनास्थळी पोहोचले. जावई पळून गेल्याचे कळताच तीन पथके स्थापन केली. जावयाला कुर्तडी पाटीजवळ ताब्यात घेतले.

दोन दिवसांपासून जेवायला दिले नाहीअजय याला पोलिसांनी सासूला मारण्याचे कारण विचारले असता दोन दिवसांपासून मला जेवण दिले नाही आणि काहीबाही बोलत होती. त्यामुळे रागाच्या भरात मी तिला मारले अशी कबुलीही त्याने दिली असल्याची माहिती बोधनापोड यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली