शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वसमत तालुक्याला महावितरणचा सर्वाधिक आकस्मिक निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

या धोरणात वसूल झालेल्या रकमेपैकी ३० टक्के रक्कम त्याच ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील विविध कामे करण्यासाठी व बळकटीकरणासाठी वापरली जाणार आहेत. ...

या धोरणात वसूल झालेल्या रकमेपैकी ३० टक्के रक्कम त्याच ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील विविध कामे करण्यासाठी व बळकटीकरणासाठी वापरली जाणार आहेत. त्यामुळे देयके भरणाऱ्या गावांना याचा फायदा होईल. ३० टक्के निधीचे जिल्हा स्तरावरून तर उर्वरित निधीचे कंपनीकडून इतर मोठ्या प्रकल्पांसाठी नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे कृषीपंपाची थकबाकी राहिल्यास अशा भागातील शेतकऱ्यांना सुविधांसाठी पुन्हा थकबाकीचे कारण पुढे केले जाऊ शकणार आहे. ही योजना गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली आहे. मात्र, तरीही त्याला तेवढा प्रतिसाद नाही. काही जिल्ह्यांमध्ये मात्र यातून शेकडो कोटींची रक्कम जमा झाली आहे. त्या तुलनेत हिंगोली मागे दिसत आहे.

औंढा तालुक्यात १२ हजार २६९ ग्राहकांकडे १९७.७३ कोटी थकले आहेत. यात सूट देऊन ११९.८४ कोटी भरणे अपेक्षित आहे. मात्र, ६१.३२ लाखच जमा झाले. तर आकस्मिक निधीत ६५.३० कोटी मिळतील. वसमत तालुक्यात २१ हजार ७०४ ग्राहक असून ३३८.८९ कोटी रुपये थकले आहेत. कृषी धोरणानुसार २१८.३७ कोटी भरायचे होते. यापैकी २.३६ कोटी भरले. आकस्मिक निधीत २.४९ कोटी जमा झाले. ही जिल्ह्यातील सर्वाधिक रक्कम आहे. हिंगोली तालुक्यात १२ हजार ४२८ ग्राहक असून १५२.५३ कोटी थकले आहेत. त्यांना सूट मिळाल्यानंतर १०० कोटी भरावे लागणार आहेत. मात्र, १.१० कोटीच जमा झाले. तर आकस्मिक निधीत १.१६ कोटी मिळाले. कळमनुरी तालुक्यात १४ हजार ६९ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १८७.६८ कोटी थकले आहेत. यात सूट दिल्यानंतर ११७.८३ कोटी भरावे लागणार आहेत. मात्र, १.६४ कोटी भरले. आकस्मिक निधीत १.७३ जमा झाले आहेत. सेनगाव तालुक्यात १४ हजार ८४८ हजार ग्राहक आहेत. तर २०३.२६ कोटी थकले आहेत. सूट दिल्यानंतर १३१ कोटी भरावे लागणार आहेत. मात्र, ९२.७९ लाखच भरले. तर आकस्मिक निधीत १.०१ कोटीच जमा झाले आहेत.

सुविधांचा प्रश्न गंभीर बनणार

महावितरणच्या नवीन धोरणानुसार थकबाकीतील सुटीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी थकबाकी भरणे अपेक्षित आहे. त्यातूनच त्या - त्या गावात, जिल्ह्यात सुविधा मिळणार असल्याने भविष्यात सुविधांसाठी हेच कारण पुढे येऊ शकते. ज्या भागात या योजनेला प्रतिसाद नाही, तेथील कामे कशी होणार? यावर विचार करावा लागणार आहे.