शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील आणखी २३६ गावे हगणदारीयुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:55 IST

जिल्ह्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींसाठी जि.प. प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मागील सहा महिन्यांत चांगलीच गती आली होती. डिसेंबरअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केल्याने १८५ गावे त्यात यशस्वी झाली तर २३६ गावे अजूनही शिल्लकच आहेत.

ठळक मुद्देमुदत संपायला चार दिवस शिल्लक : ३२७ गावांनी केला हागणदारीमुक्तीचा संकल्प पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींसाठी जि.प. प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मागील सहा महिन्यांत चांगलीच गती आली होती. डिसेंबरअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केल्याने १८५ गावे त्यात यशस्वी झाली तर २३६ गावे अजूनही शिल्लकच आहेत.हिंगोली जिल्ह्यात एकूण ५६३ ग्रा.पं. आहेत. गतवर्षीच्या मिळून एकूण ३२७ ग्रा.पं. आता हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यात औंढा ना.८८, हिंगोली-८0, वसमत-६६, कळमनुरी-६२ तर सेनगावातील ३१ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र औंढा-१३, हिंगोली-३१, वसमत-५३, कळमनुरी-६३, सेनगाव-७६ अशा २३६ ग्रा.पं.मध्ये हागणदारीमुक्ती होणे बाकी आहे.जिल्ह्यात २0१२ च्या सर्वेनुसार १.८१ लाख कुटुंबसंख्या होती. यापैकी १.५४ लाख कुटुंबांकडे शौचालय होते. तर २७ हजार कुटुंबांकडे शौचालय नव्हते. आता ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी दररोज ४५00 शौचालयांचे बांधकाम झाले तरच ते शक्य आहे. मात्र वाढलेली कुटुंबसंख्या लक्षात घेता यंदा ८५ हजार शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट होते. यापैकी ५८३१३ बांधले आहेत. तर आता जिल्ह्याचे काम ५८.0८ टक्के पूर्ण झाले आहे. यात औंढा व हिंगोली या दोनच तालुक्यांची कामगिरी समाधानकारक आहे. इतरांची मात्र पन्नास टक्के ते त्यापेक्षा कमीच प्रगती आहे. सेनगाव तालुक्यात तर अवघे २९ टक्के काम झाल्याने या तालुक्याला हागणदारीमुक्त होणेच नाही की काय, असे चित्र आहे.