शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

ई-बोलीविरोधात मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:48 IST

सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अडत व्यापारी व प्रशासनात ई-नाम योजनेच्या निमित्ताने वादाचा भडका उडाला. केंद्र शासनाने ई -नाम योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व बाजार समित्यांमध्ये ई-टेंडर पध्दतीने शेतीमाल खरेदी करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, सहाय्यक निबंधक जाधव यांनी भेट देवून व्यापाºयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ई-टेंडर पद्धतीने सर्व शेतीमाल खरेदी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. याला बैठकीतच व्यापाºयांनी तीव्र विरोध केला. ई-नाम योजनेतंर्गत बाजार समितीमध्ये ई-टेंडर पद्धतीने हळदीची खरेदी केली जात असल्याने मोंढ्यात हळदीची आवक घटल्याचा आरोप करीत या प्रणालीस विरोध केला. त्यामुळे बैठकीत व्यापारी विरुद्ध प्रशासन असा वाद निर्माण झाला.या वादातून व्यापाºयांनी मोंढा बेमुदत बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला. त्यानंतर दुपारी ३ वाजेदरम्यान यासंबंधी तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासक योगेश आरसूड, सचिव दत्तात्रय वाघ, शिवसेना उपजिल्हा संदेश देशमुख, नगरसेवक उमेश देशमुख, भुसार असोसिएशनचे अध्यक्ष बालमुकुंद जेथलिया आदींसह व्यापारी, शेतकºयांचा उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा काढला. केवळ हळद ई-टेंडर पद्धतीने खरेदी करण्यास व्यापारी तयार झाले. त्यानंतर मोंढा पुन्हा पूर्ववत झाला.बाजार समितीचा ई-नाम या केंद्र शासनाच्या योजनेत समावेश झाल्याने येथे आलेला शेतमाल या पद्धतीने खरेदी करावा अशा शासन स्तरावरून सूचना आहेत. मात्र व्यापाºयांचा त्याला विरोध असल्याचे प्रशासक योगेश आरसूड यांनी सांगितले.ई-टेंडर पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यासाठी शेतकºयांचा विरोध आहे. हळदीची आवक घटली आहे. ई-नाम मधे अनेक किचकट अटी असल्याने आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया भुसार असोशिएनचे अध्यक्ष बालमुकंद जेथलिया यांनी दिली.बुधवार आठवडी बाजार असल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता. परंतु दुपारपर्यंत मोंढा बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय झाली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डEconomyअर्थव्यवस्था