शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ई-बोलीविरोधात मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:48 IST

सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अडत व्यापारी व प्रशासनात ई-नाम योजनेच्या निमित्ताने वादाचा भडका उडाला. केंद्र शासनाने ई -नाम योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व बाजार समित्यांमध्ये ई-टेंडर पध्दतीने शेतीमाल खरेदी करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, सहाय्यक निबंधक जाधव यांनी भेट देवून व्यापाºयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ई-टेंडर पद्धतीने सर्व शेतीमाल खरेदी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. याला बैठकीतच व्यापाºयांनी तीव्र विरोध केला. ई-नाम योजनेतंर्गत बाजार समितीमध्ये ई-टेंडर पद्धतीने हळदीची खरेदी केली जात असल्याने मोंढ्यात हळदीची आवक घटल्याचा आरोप करीत या प्रणालीस विरोध केला. त्यामुळे बैठकीत व्यापारी विरुद्ध प्रशासन असा वाद निर्माण झाला.या वादातून व्यापाºयांनी मोंढा बेमुदत बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला. त्यानंतर दुपारी ३ वाजेदरम्यान यासंबंधी तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासक योगेश आरसूड, सचिव दत्तात्रय वाघ, शिवसेना उपजिल्हा संदेश देशमुख, नगरसेवक उमेश देशमुख, भुसार असोसिएशनचे अध्यक्ष बालमुकुंद जेथलिया आदींसह व्यापारी, शेतकºयांचा उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा काढला. केवळ हळद ई-टेंडर पद्धतीने खरेदी करण्यास व्यापारी तयार झाले. त्यानंतर मोंढा पुन्हा पूर्ववत झाला.बाजार समितीचा ई-नाम या केंद्र शासनाच्या योजनेत समावेश झाल्याने येथे आलेला शेतमाल या पद्धतीने खरेदी करावा अशा शासन स्तरावरून सूचना आहेत. मात्र व्यापाºयांचा त्याला विरोध असल्याचे प्रशासक योगेश आरसूड यांनी सांगितले.ई-टेंडर पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यासाठी शेतकºयांचा विरोध आहे. हळदीची आवक घटली आहे. ई-नाम मधे अनेक किचकट अटी असल्याने आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया भुसार असोशिएनचे अध्यक्ष बालमुकंद जेथलिया यांनी दिली.बुधवार आठवडी बाजार असल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता. परंतु दुपारपर्यंत मोंढा बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय झाली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डEconomyअर्थव्यवस्था