शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विशुद्ध भावनेने भक्ती केल्यास मोक्षप्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST

हिंगोली : आपण जेवण करता करता अनंत भव (जन्म) निघून जातात; पण विशुद्ध भावातून मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती आतापर्यंत आपण ...

हिंगोली : आपण जेवण करता करता अनंत भव (जन्म) निघून जातात; पण विशुद्ध भावातून मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती आतापर्यंत आपण केली नाही. असे असले तरी, एकदा तरी आपण विशुद्ध भावनेने जिनेंद्र प्रभूंची भक्ती केल्यास मोक्षाची प्राप्ती होते, असे उद्‌गार प. पू. श्रवण मुनिजी १०८ विशेष सागरजी महाराज यांनी काढले.

पुसेगाव येथील जैन भवनमध्ये आयोजित तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या मोक्ष कल्याणक महोत्सवप्रसंगी धर्मसभेला संबोधित करताना ते बोलत होते. प. पू. मुनिश्रींनी सांगितले की, जैन धर्मात २४ तीर्थंकर आहेत. आजपासून करोडो वर्षांपूर्वी जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांचा जन्म झाला होता. आयुष्याच्या शेवटी त्यांनी राजपट व परिवाराचा त्याग केला. त्यानंतर जैन मुनी दीक्षा ग्रहण केली. मुनी दीक्षा ग्रहण केल्यानंतर त्यांनी तप, साधना करून कैलासगिरी पर्वतावरून त्यांना मोक्षप्राप्ती झाली. या मोक्षकल्याणकचे औचित्य साधून जैन भवन, पुसेगाव येथील बाहुबली भगवान प्रांगणात १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी ‘श्रीं’चा अभिषेक व शांतिधारा संपन्न झाली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी आचार्यश्रींची भक्ती व ४८ दीपक प्रज्वलित करून महाआरती करण्यात आली.

११ फेब्रुवारी रोजी दुपारी ११ वाजून ३० मिनिटांनी अभिषेक, पूजन व सप्तऋषी विधान होणार आहे. नंतर प. पू. मुनिश्रींचे प्रवचन होणार आहे. सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी गुरुभक्ती व प. पू. मुनिश्री यांच्या जीवनदर्शनावर आधारित ‘चलो चले जसपूर’ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी वेदी शिलान्यास, पिंच्छी परिवर्तन व गुरू उपकार कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी अभिषेक व वास्तू विधान, दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी वेदी शिलान्यास विधी, १ वाजून ३० मिनिटांनी छायाचित्राचे अनावरण, दीपप्रज्वलन व मुनिश्रींचे पूजन, पादप्रक्षालन, १५ ग्रंथभेट, अतिथी सत्कार होणार आहे.