शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या मध्यान्ह भोजनावरून पुन्हा आमदार बांगर संतप्त, तीव्र आवाज उठविण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 21:13 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे भरमसाठ कामगार वाढवून त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेतील गैरप्रकाराला अजूनही आळा बसला नाही.

हिंगोली : बनावट कागदपत्रांच्या आधारे भरमसाठ कामगार वाढवून त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेतील गैरप्रकाराला अजूनही आळा बसला नाही. डाळीत आळ्या आणि करपलेल्या चपात्या व मेन्यूतील इतर पदार्थच गायब असल्याचे आ.संतोष बांगर यांना पुन्हा एकदा आढळून आले आहे.

जिल्ह्यात या योजनेवरून कामगारांमध्ये ओरड सुरू आहे. अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांपेक्षा इतरच कुणाची तरी नावे घुसडून या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढविण्याचा प्रकार झाला. आता हा प्रकार अधिकाऱ्यांनी केला की इतर कोणी याची साधी चौकशीही व्हायला तयार नाही. वर्षानुवर्षे हिंगोलीच्याच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या व गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या प्रकाराचे काही सोयरसूतक नाही. सगळे काही आलबेल असल्याचेच ही मंडळी अगदी ठासून सांगते.

दुसरीकडे हे भोजन खाणारे खरे कामगार मात्र ओरड करीत आहेत. कधी चपात्या तर कधी भात मिळत नाही. कधी भाजी तर कधी वरण मिळत नाही. सलाद मिळाले त्या दिवशी तर ते स्वत:ला नशीबवान समजतात. या सगळ्या प्रकारावर कामगार विभाग मात्र कायम पांघरून घालत असल्याचे आज आ.संतोष बांगर यांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या प्रकारानंतर पुन्हा एकदा समोर आले आहे.

लोकमतमध्ये वसमत तालुक्यातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आ.संतोष बांगर यांच्याकडे अनेक कामगारांनी तक्रारी केल्या. तुम्ही मॅनेजरच्या कानशिल लाल केले तरीही जेवण मात्र दर्जेदार मिळत नसल्याची त्यांची ओरड होती. हिंगोलीत एक वाहन थांबवून कामगारांनी आ.संतोष बांगर यांनाच पाहणीसाठी पाचारण गेले. ते तेथे गेले असता त्यांना गाडीतील हेल्परने मेन्यूबाबत उडवाउडवीची उत्तेर दिली. त्यानंतर मेन्यू कळाला. तर यात गुळ नव्हता. सलादच्या नावाखाली फक्त चिरलेली कोबी होती. चपात्या करपलेल्या तर डाळीत आळ्या होत्या.

जेवणापेक्षा कामगारांच्या खात्यावर रक्कम टाकाया प्रकारानंतर आ.संतोष बांगर म्हणाले, असे दर्जाहीन जेवण देवून संबंधित कंत्राटदाराने कामगारांच्या जीवाशी खेळ मांडला. यापूर्वी यामुळेच संतापाने मी एकाच्या कानशिलात मारली. तरीही तीच मनमानी सुरू आहे.कष्टकऱ्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कंत्राट रद्द करून थेट कामगारांच्या खात्यावर रक्कम टाकावी. अन्यथा आगामी काळात पुन्हा यावरून तीव्र आवाज उठविण्याचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :HingoliहिंगोलीShiv Senaशिवसेना