शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

दुसऱ्या दिवशीही मंत्र्यांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:16 IST

टंचाईग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सलग दुसºया दिवशी जिल्ह्यात पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन-प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने कामे करुन टंचाईवर मात करु, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : टंचाईग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सलग दुसºया दिवशी जिल्ह्यात पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन-प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने कामे करुन टंचाईवर मात करु, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.आज पालकमंत्र्यांनी हिंगोली तालुक्यातील रायपूरवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून सद्य:स्थितीत पाण्याची उपलब्धता, चालू टँकर आणि अधिग्रहण केलेल्या बोअर-विहिंरीची माहिती घेवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तर गावात टँकर आल्यानंतर नागरिकांनी घाई-गडबड न करता पाणी भरुन घ्यावे. पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, अशा सूचनाही दिल्या.हिंगोली तालुक्यातील माळसेलू ग्रामस्थांच्या कांबळे यांनी समस्या जाणून घेतल्या. गावात टँकरच्या चार खेपा केल्या जातील आणि वन्यजीव प्राण्यांपासून गावाला होणाºया त्रासाबद्दल वन विभागास सूचना केल्या जातील. माळसेलू गावाने ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केले.सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावास कांबळे यांनी भेट देऊन टंचाईग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. याठिकाणी दोन बोअरचे अधिग्रहण केल्याने गावातील पाणीप्रश्न सुटल्याचे ग्रामस्थांनी कांबळे यांना सांगितले. तर त्यांनी ताकतोडा येथेही जाऊन टंचाईबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी दौºयात विविध पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, औंढा तालुक्यातील येळेगाव सोळुंके, ब्राह्मणवाडा तांडा या गावांमध्ये पाणीटंचाई असून या गावांना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट दिली. येहळेगाव सोळुंके व रामेश्वर येथील ग्रामस्थांनी पाण्याचा प्रश्न मांडला. पालकमंत्र्यांनी त्वरित टँकर सुरू करण्याचे आदेश तहसीलदार आणि बीडीओंंना दिले. शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या कुटुंबांचे ब्राह्मणवाडा येथे जाऊन पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. यावेळी माजी खा. शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, सूरजितसिंग ठाकूर, नगरसेवक गणेश बांगर, शरद पाटील, दिलीप सांगळे, संतोष देशमुख, बीडीओ डॉ.सुधीर ढोंबरे, सूरज श्यामशेट्टीवार, आनंद शिंदे, माधव भुजावळे व कार्यकर्ते उपस्थित होते.धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्रहिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे हे ९ मे रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौºयावर आले आहेत. सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळेत त्यांनी मुक्काम केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी जाणून घेतल्या. जेवणाची व्यवस्था नसल्याने एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.यावेळी परिसरातील शेतकºयांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. पाणी प्रश्न, रोहयो, चारा छावण्या आदी समस्यांवर उपाययोजना करण्याचे अश्वासन दिले. भविष्यात चाराप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकºयांनी मागणी केल्यास तातडीने चारा छावण्या सुरु केल्या जातील.काही गावात फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने तेथे फिल्टरचे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असून याबाबत प्रशासनाला सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतमजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोहयोची कामे तातडीने सुरु केली जातील. प्रत्येक गावातून किमान दहा कामे सुरु करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणministerमंत्री