शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

दुसऱ्या दिवशीही मंत्र्यांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:16 IST

टंचाईग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सलग दुसºया दिवशी जिल्ह्यात पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन-प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने कामे करुन टंचाईवर मात करु, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : टंचाईग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सलग दुसºया दिवशी जिल्ह्यात पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन-प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने कामे करुन टंचाईवर मात करु, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.आज पालकमंत्र्यांनी हिंगोली तालुक्यातील रायपूरवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून सद्य:स्थितीत पाण्याची उपलब्धता, चालू टँकर आणि अधिग्रहण केलेल्या बोअर-विहिंरीची माहिती घेवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तर गावात टँकर आल्यानंतर नागरिकांनी घाई-गडबड न करता पाणी भरुन घ्यावे. पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, अशा सूचनाही दिल्या.हिंगोली तालुक्यातील माळसेलू ग्रामस्थांच्या कांबळे यांनी समस्या जाणून घेतल्या. गावात टँकरच्या चार खेपा केल्या जातील आणि वन्यजीव प्राण्यांपासून गावाला होणाºया त्रासाबद्दल वन विभागास सूचना केल्या जातील. माळसेलू गावाने ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केले.सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावास कांबळे यांनी भेट देऊन टंचाईग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. याठिकाणी दोन बोअरचे अधिग्रहण केल्याने गावातील पाणीप्रश्न सुटल्याचे ग्रामस्थांनी कांबळे यांना सांगितले. तर त्यांनी ताकतोडा येथेही जाऊन टंचाईबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी दौºयात विविध पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, औंढा तालुक्यातील येळेगाव सोळुंके, ब्राह्मणवाडा तांडा या गावांमध्ये पाणीटंचाई असून या गावांना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट दिली. येहळेगाव सोळुंके व रामेश्वर येथील ग्रामस्थांनी पाण्याचा प्रश्न मांडला. पालकमंत्र्यांनी त्वरित टँकर सुरू करण्याचे आदेश तहसीलदार आणि बीडीओंंना दिले. शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या कुटुंबांचे ब्राह्मणवाडा येथे जाऊन पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. यावेळी माजी खा. शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, सूरजितसिंग ठाकूर, नगरसेवक गणेश बांगर, शरद पाटील, दिलीप सांगळे, संतोष देशमुख, बीडीओ डॉ.सुधीर ढोंबरे, सूरज श्यामशेट्टीवार, आनंद शिंदे, माधव भुजावळे व कार्यकर्ते उपस्थित होते.धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्रहिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे हे ९ मे रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौºयावर आले आहेत. सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळेत त्यांनी मुक्काम केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी जाणून घेतल्या. जेवणाची व्यवस्था नसल्याने एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.यावेळी परिसरातील शेतकºयांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. पाणी प्रश्न, रोहयो, चारा छावण्या आदी समस्यांवर उपाययोजना करण्याचे अश्वासन दिले. भविष्यात चाराप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकºयांनी मागणी केल्यास तातडीने चारा छावण्या सुरु केल्या जातील.काही गावात फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने तेथे फिल्टरचे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असून याबाबत प्रशासनाला सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतमजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोहयोची कामे तातडीने सुरु केली जातील. प्रत्येक गावातून किमान दहा कामे सुरु करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणministerमंत्री