शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

जिल्ह्यात कुटुंब नियोजनाकडे पुरूषांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

हिंगोली: नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामक समजुती पाळल्या जात असल्याने पुरूषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे चित्र ...

हिंगोली: नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामक समजुती पाळल्या जात असल्याने पुरूषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. आरोग्य विभागाला ७०८ पुरूष शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. मात्र आतापर्यंत एकही पुरूष शस्त्रक्रिया झाली नसल्याचे समोर आले आहे. तर चालू वर्षात आतापर्यंत २ हजार ६९६ महिलांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या आहेत.

कुटुंब नियोजनासाठी शासनातर्फे दरवर्षी मोहीम राबवण्यात येते. यासाठी उद्दिष्टही ठरवले जाते. तसेच शासनातर्फे शस्त्रक्रिया करणाऱ्यांना अनुदानही दिले जाते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना शासनातर्फे ६०० रूपये तर इतर महिलांना २५० रूपये अनुदान दिले जाते. तर पुरूषांना नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी १ हजार १०० रूपये मिळतात. स्त्रिया आणि पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जनजागृतीही करण्यात येते. मात्र, असे असतानाही महिलांच्या तुलनेत मोजकेच पुरुष शस्त्रक्रिया करत असल्याचे वास्तव आहे. चालू वर्षभरात तर जिल्ह्यात एकाही पुरूषाने शस्त्रक्रिया केली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच आहे.

जिल्ह्यात चालू वर्षात एकूण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ८ हजार ५०७ आहे. त्यापैकी आतापर्यंत २ हजार ६९६ शस्त्रक्रिया पार पडल्या. यात पुरूष शस्त्रक्रियेचा वाटा काडीचाही नसून सर्व शस्त्रक्रिया महिलांच्याच आहेत. यात जिल्हा आरोग्य विभागाला ५ हजार ६९२ चे उद्दिष्ट स्त्री शस्त्रक्रियांचे देण्यात आले होते. त्यापैकी १ हजार २५७ शस्त्रक्रिया पार पडल्या. यातील ३२५ शस्त्रक्रिया ह्या फेब्रुवारी महिन्यातील आहेत. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास २ हजार १०७ चे स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत १ हजार ४३९ चे उद्दिष्ट पार केले आहे. पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे जिल्हा आरोग्य विभागाला ५१७ चे तर जिल्हा शल्य चिकित्सक विभागाला १९१ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र एकाही विभागाला या शस्त्रक्रियेची सुरुवात करता आली नाही. त्यामुळे कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच असल्याचे दिसून येत आहे.