शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

जिल्हा कचेरी प्रांगणात विवाह लावणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 20:42 IST

तालुक्यातील मळईवासियांचा रस्त्याच्या मागणीचा प्रश्न रास्त असला तरीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेची लेखी माहिती दिल्यानंतरही ग्रामस्थ बघायला तयार नाहीत.

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.30 - तालुक्यातील मळईवासियांचा रस्त्याच्या मागणीचा प्रश्न रास्त असला तरीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेची लेखी माहिती दिल्यानंतरही ग्रामस्थ बघायला तयार नाहीत. आता तर गावातील एका मुलीचे लग्नच जिल्हा कचेरीच्या प्रांगणात लावण्याचा इशारा दिल्याने प्रशासन हैराण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्याच्या दौ-यावर येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्याची तयारी करण्यात प्रशासन पूर्णपणे व्यस्त असताना मळईवासियांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी विवेक काळे हे स्थळ पंचनामा करण्यासाठी त्या गावातही गेले. त्याचा अहवालही दाखल करणे सुरू आहे. अचानक दुस-या दिवशी म्हणजे ३0 रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. त्यात ३१ मे रोजी गावातील काशीराम पांडे यांची मुलगी छाया हिचा हिंगोली तालुक्यातील जांभरुण आंध येथील धनाजी जटाळे यांचे चिरंजीव नारायण यांच्यासोबत होणार आहे. मात्र गावात जायला रस्ताच नसल्याने हा विवाह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 
या प्रकाराबाबत तहसीलदार विजय अवधाने यांना विचारले असता ते म्हणाले, प्रशासनाकडून ग्रामस्थांना पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. अशा प्रकरणांत सुनावणीला महत्त्व आहे. दोनदा अशी सुनावणी झाली. रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यताही दिली आहे. अंतिम निकाल तेवढा बाकी आहे. मात्र ग्रामस्थांच्या आडून काहीजण प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेतकी काय? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तर ग्रामस्थांना खरेच असा त्रासही होत असल्याशिवाय ते जिल्हा कचेरीच्या प्रांगणात लग्न लावण्याची टोकाची भूमिका घेणेही शक्य वाटत नाही.
उपविभागीय अधिकारी विवेक काळे म्हणाले, मळई ग्रामस्थांना रस्ता देण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरि प्रयत्न सुरू आहेत. ही मंडळी एकाचवेळी न्यायालयातही दाद मागते अन् प्रशासनाकडेही. शिवाय मी रस्त्याची स्थळ पाहणीही केली. रस्ता देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तरच ही समस्या कायमची सुटणार आहे. तसे त्या ग्रामस्थांना कळवूनही त्यांनी दिलेला इशारा दुर्देवी आहे.
याबाबत आ.संतोष टारफे म्हणाले, की प्रशासनाने यात लक्ष घालून तोडगा काढणे गरजेचे आहे. यापूर्वीही मी यासंदर्भात अधिका-यांशी बोललो. १६ फुटाचा रस्ता देण्यासाठी प्रशासनाने तयारीही केली आहे. काही कायदेशीर औपचारिकता तेवढ्या बाकी आहेत.
 
पोलिसांच्या हालचाली : पुन्हा गेले गावात
जिल्हा कचेरीच्या आवारात लग्न लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनाही याबाबत खबरदार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंगोली शहर व बासंबा पोलिस सक्रिय झाले होते. हिंगोलीचे पो.नि.जगदीश भंडरवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आमच्या रस्त्याला अडथळा येणार नसेल तर गावात लग्न लावू, असे काहीजण सांगत होते. तर बासंबा पोलिस ठाण्यात पेडगावचे पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदींना बोलावले होते. त्यांनी रस्ता देण्याची तयारी दाखविली होती.
 
पूर्ण तोडगा नाही..
रात्री आठ वाजेपर्यंत चर्चेचे गु-हाळ सुरू होते. मात्र या प्रकरणात पूर्ण तोडगा निघालेला नव्हता. मंगल कार्याच्या प्रसंगात वादविवाद नको, असे काहींना वाटत होते. तर काही निर्णयावर ठाम होते.