शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

जिल्हा कचेरी प्रांगणात विवाह लावणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 20:42 IST

तालुक्यातील मळईवासियांचा रस्त्याच्या मागणीचा प्रश्न रास्त असला तरीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेची लेखी माहिती दिल्यानंतरही ग्रामस्थ बघायला तयार नाहीत.

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.30 - तालुक्यातील मळईवासियांचा रस्त्याच्या मागणीचा प्रश्न रास्त असला तरीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेची लेखी माहिती दिल्यानंतरही ग्रामस्थ बघायला तयार नाहीत. आता तर गावातील एका मुलीचे लग्नच जिल्हा कचेरीच्या प्रांगणात लावण्याचा इशारा दिल्याने प्रशासन हैराण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्याच्या दौ-यावर येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्याची तयारी करण्यात प्रशासन पूर्णपणे व्यस्त असताना मळईवासियांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी विवेक काळे हे स्थळ पंचनामा करण्यासाठी त्या गावातही गेले. त्याचा अहवालही दाखल करणे सुरू आहे. अचानक दुस-या दिवशी म्हणजे ३0 रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. त्यात ३१ मे रोजी गावातील काशीराम पांडे यांची मुलगी छाया हिचा हिंगोली तालुक्यातील जांभरुण आंध येथील धनाजी जटाळे यांचे चिरंजीव नारायण यांच्यासोबत होणार आहे. मात्र गावात जायला रस्ताच नसल्याने हा विवाह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 
या प्रकाराबाबत तहसीलदार विजय अवधाने यांना विचारले असता ते म्हणाले, प्रशासनाकडून ग्रामस्थांना पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. अशा प्रकरणांत सुनावणीला महत्त्व आहे. दोनदा अशी सुनावणी झाली. रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यताही दिली आहे. अंतिम निकाल तेवढा बाकी आहे. मात्र ग्रामस्थांच्या आडून काहीजण प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेतकी काय? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तर ग्रामस्थांना खरेच असा त्रासही होत असल्याशिवाय ते जिल्हा कचेरीच्या प्रांगणात लग्न लावण्याची टोकाची भूमिका घेणेही शक्य वाटत नाही.
उपविभागीय अधिकारी विवेक काळे म्हणाले, मळई ग्रामस्थांना रस्ता देण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरि प्रयत्न सुरू आहेत. ही मंडळी एकाचवेळी न्यायालयातही दाद मागते अन् प्रशासनाकडेही. शिवाय मी रस्त्याची स्थळ पाहणीही केली. रस्ता देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तरच ही समस्या कायमची सुटणार आहे. तसे त्या ग्रामस्थांना कळवूनही त्यांनी दिलेला इशारा दुर्देवी आहे.
याबाबत आ.संतोष टारफे म्हणाले, की प्रशासनाने यात लक्ष घालून तोडगा काढणे गरजेचे आहे. यापूर्वीही मी यासंदर्भात अधिका-यांशी बोललो. १६ फुटाचा रस्ता देण्यासाठी प्रशासनाने तयारीही केली आहे. काही कायदेशीर औपचारिकता तेवढ्या बाकी आहेत.
 
पोलिसांच्या हालचाली : पुन्हा गेले गावात
जिल्हा कचेरीच्या आवारात लग्न लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनाही याबाबत खबरदार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंगोली शहर व बासंबा पोलिस सक्रिय झाले होते. हिंगोलीचे पो.नि.जगदीश भंडरवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आमच्या रस्त्याला अडथळा येणार नसेल तर गावात लग्न लावू, असे काहीजण सांगत होते. तर बासंबा पोलिस ठाण्यात पेडगावचे पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदींना बोलावले होते. त्यांनी रस्ता देण्याची तयारी दाखविली होती.
 
पूर्ण तोडगा नाही..
रात्री आठ वाजेपर्यंत चर्चेचे गु-हाळ सुरू होते. मात्र या प्रकरणात पूर्ण तोडगा निघालेला नव्हता. मंगल कार्याच्या प्रसंगात वादविवाद नको, असे काहींना वाटत होते. तर काही निर्णयावर ठाम होते.