शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरी प्रांगणात विवाह लावणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 20:42 IST

तालुक्यातील मळईवासियांचा रस्त्याच्या मागणीचा प्रश्न रास्त असला तरीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेची लेखी माहिती दिल्यानंतरही ग्रामस्थ बघायला तयार नाहीत.

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.30 - तालुक्यातील मळईवासियांचा रस्त्याच्या मागणीचा प्रश्न रास्त असला तरीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेची लेखी माहिती दिल्यानंतरही ग्रामस्थ बघायला तयार नाहीत. आता तर गावातील एका मुलीचे लग्नच जिल्हा कचेरीच्या प्रांगणात लावण्याचा इशारा दिल्याने प्रशासन हैराण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्याच्या दौ-यावर येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्याची तयारी करण्यात प्रशासन पूर्णपणे व्यस्त असताना मळईवासियांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी विवेक काळे हे स्थळ पंचनामा करण्यासाठी त्या गावातही गेले. त्याचा अहवालही दाखल करणे सुरू आहे. अचानक दुस-या दिवशी म्हणजे ३0 रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. त्यात ३१ मे रोजी गावातील काशीराम पांडे यांची मुलगी छाया हिचा हिंगोली तालुक्यातील जांभरुण आंध येथील धनाजी जटाळे यांचे चिरंजीव नारायण यांच्यासोबत होणार आहे. मात्र गावात जायला रस्ताच नसल्याने हा विवाह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 
या प्रकाराबाबत तहसीलदार विजय अवधाने यांना विचारले असता ते म्हणाले, प्रशासनाकडून ग्रामस्थांना पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. अशा प्रकरणांत सुनावणीला महत्त्व आहे. दोनदा अशी सुनावणी झाली. रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यताही दिली आहे. अंतिम निकाल तेवढा बाकी आहे. मात्र ग्रामस्थांच्या आडून काहीजण प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेतकी काय? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तर ग्रामस्थांना खरेच असा त्रासही होत असल्याशिवाय ते जिल्हा कचेरीच्या प्रांगणात लग्न लावण्याची टोकाची भूमिका घेणेही शक्य वाटत नाही.
उपविभागीय अधिकारी विवेक काळे म्हणाले, मळई ग्रामस्थांना रस्ता देण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरि प्रयत्न सुरू आहेत. ही मंडळी एकाचवेळी न्यायालयातही दाद मागते अन् प्रशासनाकडेही. शिवाय मी रस्त्याची स्थळ पाहणीही केली. रस्ता देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तरच ही समस्या कायमची सुटणार आहे. तसे त्या ग्रामस्थांना कळवूनही त्यांनी दिलेला इशारा दुर्देवी आहे.
याबाबत आ.संतोष टारफे म्हणाले, की प्रशासनाने यात लक्ष घालून तोडगा काढणे गरजेचे आहे. यापूर्वीही मी यासंदर्भात अधिका-यांशी बोललो. १६ फुटाचा रस्ता देण्यासाठी प्रशासनाने तयारीही केली आहे. काही कायदेशीर औपचारिकता तेवढ्या बाकी आहेत.
 
पोलिसांच्या हालचाली : पुन्हा गेले गावात
जिल्हा कचेरीच्या आवारात लग्न लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनाही याबाबत खबरदार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंगोली शहर व बासंबा पोलिस सक्रिय झाले होते. हिंगोलीचे पो.नि.जगदीश भंडरवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आमच्या रस्त्याला अडथळा येणार नसेल तर गावात लग्न लावू, असे काहीजण सांगत होते. तर बासंबा पोलिस ठाण्यात पेडगावचे पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदींना बोलावले होते. त्यांनी रस्ता देण्याची तयारी दाखविली होती.
 
पूर्ण तोडगा नाही..
रात्री आठ वाजेपर्यंत चर्चेचे गु-हाळ सुरू होते. मात्र या प्रकरणात पूर्ण तोडगा निघालेला नव्हता. मंगल कार्याच्या प्रसंगात वादविवाद नको, असे काहींना वाटत होते. तर काही निर्णयावर ठाम होते.