शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘ब्रेक दी चेन’च्या निर्बंधांना ‘ब्रेक’ देत बाजारपेठ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

हिंगोली : मागील महिनाभरात दोनदा टाळेबंदीचा सामना करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर सोमवारी फुटला. सोमवारी व्यापाऱ्यांनी ‘ब्रेक ...

हिंगोली : मागील महिनाभरात दोनदा टाळेबंदीचा सामना करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर सोमवारी फुटला. सोमवारी व्यापाऱ्यांनी ‘ब्रेक दी चेन’च्या नियमांनाच ‘ब्रेक’ देत बाजारपेठेतील सर्वच दुकाने सुरू केली. पोलीस, महसूल वा इतर कोणतीही यंत्रणा त्यांना प्रतिबंध करण्याच्या भानगडीत पडली नाही. हिंगोली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारीच दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांसमवेत व्यापारी महासंघाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्याचदिवशी असल्याने दुकाने उघडण्यात आली नव्हती. शनिवारी व रविवारी वीकेंड लाॅकडाऊनचे प्रतिबंध पाळण्याची तयारी आधीपासूनच व्यापाऱ्यांनी दाखवली होती. त्यामुळे दोन दिवस जीवनावश्यक वगळता इतर दुकाने बंद होती. सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्व व्यापारी तयारीनेच आले होते. सर्वांनीच आपापली दुकाने उघडल्याने सर्व बाजारपेठ खुली झाली. हे पाहून आधी पोलिसांनी याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सगळी बाजारपेठच उघडली. व्यापारी व ग्राहकांचे टोळके रस्त्यावर ठिकठिकाणी जमलेले होते. त्यामुळे पोलिसांनी निर्बंधांना झुगारणाऱ्यांना पुढे काही विचारणा केली नाही.

राज्य शासनानेही कालच्या बैठकीत १४ तारखेनंतर टाळेबंदी लावण्याचे संकेत दिले आहेत. त्याचाही परिणाम आज बाजारपेठेवर दिसून आला. जर टाळेबंदी लागणारच असेल तर त्यापूर्वी नागरिकांना त्यांच्या निकडीच्या वस्तू घेता याव्यात, यासाठी प्रशासनानेही ढील दिल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून व्यापारी महासंघाच्या दोन्ही संघटनांकडून दुकाने उघडण्यात येतील, असे सांगितले जात होते. तर व्यापाऱ्यांनी सामूहिक दुकाने उघडण्याचे आवाहनही केले होते. त्यामुळे सोमवारी दुकाने उघडल्याचे पहायला मिळाले.

ग्रामीण भागातून गर्दी वाढली

सोमवारी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात हिंगोलीत खरेदी करायला आल्याचे पहायला मिळाले. अनेकजण साठा करण्यासाठी माल घेऊन जात असल्याचे दिसून आले. टाळेबंदी झाली तर ग्रामीण भागात मालाची टंचाई होऊ नये म्हणून अनेक दुकानदार काळजी घेत आहेत.

व्यापारी महासंघाचे पदाधिकारी रस्त्यावर

हिंगोलीत सोमवारी सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. त्याला प्रशासनाकडून विरोध झाल्यास एकत्रितपणे लढा देण्यासाठी व्यापारी महासंघाचे पदाधिकारीही रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मात्र, प्रशासनातील काहींनी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कोणतीही कारवाई न करता प्रशासनाने दुकाने सुरू राहू देणेच पसंत केले.