शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

लोकचळवळीतून नद्या जिवंत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:27 IST

लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १५ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १५ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.यावेळी डॉ. राजेश पुराणी, उमाकांत कुलकर्णी, जयाजी पाईकराव, डॉ. किशन लखमावार, मगर यांच्यासह जलप्रेमी उपस्थित होते. कयाधू नदी पुनरूज्जीवित संदर्भात कार्यशाळा मार्गदर्शनासाठी राजेंद्रसिंह राणा हिंगोलीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले राज्य सरकार आणि नागरीकांच्या सहभागातूनच कयाधू नदीला पुनरूज्जीवीत करता येणे शक्य आहे. यासाठी नदीवरील अतिक्रमण हटविणेही तितकेच महत्वाचे आहे. ज्यामुळे पुढील कामे करता येतील. यामध्ये प्रशासनाची भुमिका महत्त्वाची आहे. नदी प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून याला वेळीच आळा घालावा लागेल. यासाठी ज्या काही उपाय-योजना आहेत त्या कराव्या लागतील. जलसाक्षरता अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेही ते म्हणाले. जलप्रदुषण करणाऱ्यांना जेलात पाठवू, अन् नदी पुनरूज्जीवित करू असे राणा यावेळी म्हणाले.जि. प. सभागृहात आयोजित कार्यशाळेत राणा यांनी कयाधू पुनरूज्जीवित संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी