शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शालेय पोषण आहार रेकॉर्ड बनविण्याचे रखडले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:58 IST

शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले नाही. याबाबत शिक्षण खात्यातील संबंधित विभागाला विचारले असता, बिले तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या कामात अनियमता हे नित्याचेच बनले आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली आहे. जिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८६९ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या सर्व शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेची लेखा-जोखा ठेवण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीचे रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रूपये म्हणजेच १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही अद्याप एकाच्याही खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली नाही. शिक्षण विभागातील शलेय पोषण आहार विभागाकडे याबाबत माहितीही उपलब्ध नाही. केवळ बिल तयार करण्याची कामे सुरू असल्याचे टोलवा-टोलवी उत्तरे ऐकवयास मिळत आहेत.पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शासनाकडून दिला जाणारा शालेय पोषण आहार योजनेच्या तांदुळाचा पुरवठा वेळेत होत नाही. मागील पंधरा दिवसांपासून शाळेत तांदूळच उपलब्ध नसल्यामुळे मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित आहेत. अन् आता उन्हाळ्याच्या सुट्यांत तांदूळ वाटपाचीप्रक्रिया मागील दोन दिवसांपासून सुरू केली. मात्र आता शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असल्याने तांदूळ सांभाळण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येणार हे निश्चित आहे. ऐन सुट्यांच्या कालावधी आता तांदळाचा पुरवठा केला जात आहे.शालेय पोषण आहारच्या तांदूळ वाटप केला जात आहे. आणि मे महिन्यात शाळांना सुट्याही लागणार आहेत. त्यामुळे शाळेतील तांदूळ सांभाळण्याची जबाबदारी वाढली आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी