शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

परजिल्ह्यातील उमेदवारांवर महावितरणची मेहरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:34 IST

वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी हिंगोलीत मात्र परजिल्ह्यातील उमेदवारांची यादी लागल्याने तक्रारींचा सूर वाढला आहे. खा.राजीव सातव यांच्याकडे तक्रारी आल्याने त्यांनीही यात स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे अन्यथा हा मुद्दा उचलण्यात येईल, असा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी हिंगोलीत मात्र परजिल्ह्यातील उमेदवारांची यादी लागल्याने तक्रारींचा सूर वाढला आहे. खा.राजीव सातव यांच्याकडे तक्रारी आल्याने त्यांनीही यात स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे अन्यथा हा मुद्दा उचलण्यात येईल, असा इशारा दिला.महावितरणच्या वतीने शिकाऊ वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या एका वर्षाच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची भरती होत आहे. यामध्ये ५ ते ७ हजारांपर्यंतच्या वेतनावर उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या भरतीत बहुतांश ठिकाणी स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांना इतर जिल्ह्यात संधी मिळाली नाही. मात्र हिंगोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत खा.राजीव सातव यांनाही शिष्टमंडळ भेटले. त्यात इतर जिल्ह्यांच्या याद्याच पुराव्यादाखल दाखविल्या. त्यात जिल्ह्यातील उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सातव म्हणाले, आपल्या जिल्ह्यात प्राधान्य नाही अन् इतर जिल्ह्यातही नोकरी मिळणार नसेल तर येथील मुलांनी जायचे कुठे? कोणत्या तरी एका धोरणावर ठाम राहून महावितरणने भरती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. काँग्रेसचे आमदार विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करतील.याबाबत अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात सर्वत्रच भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. आॅनलाईन अर्ज करायचे होते. गुणवत्तेनुसारच भरतीचा आदेश आहे. जिल्ह्यात प्राधान्याचा विषय नाही. मात्र कुणी चूक केली म्हणून आम्ही का करावी?

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण