शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:31 IST

बंडखोरीचे पीक आल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे

ठळक मुद्देहिंगोलीत सर्वात कमी अर्ज

- विजय पाटील 

हिंगोली : जिल्ह्यात वसमत व कळमनुरीत बंडखोरीचे पीक आल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.  कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे संतोष बांगर व काँग्रेसचे संतोष टारफे या दोन प्रमुख उमेदवारांत अटीतटीचा सामना रंगणार आहे. त्यात वंचितकडून अजित मगर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. 

या मतदारसंघात अजूनही काँग्रेसची बरीचशी मंडळी सक्रियच नाही. खा.राजीव सातव यांनीही उमेदवारी जाहीर केल्यानंतर फारसे लक्ष घातले नाही. अर्ज भरण्यासाठी ते हिंगोलीत फिरकले नाहीत. कळमनुरीत मात्र त्यांनी नावालाच हजेरी लावली. त्याचाही परिणाम म्हणून इतर मंडळी संभ्रमात दिसत आहे. 

भाजपचे अ‍ॅड. शिवाजी माने व गजानन घुगे यांनी बंडखोरीची भाषा चालविली आहे. मात्र सेनेकडून मनधरणीही जोरात सुरू आहे. त्यात अपयश आले तर लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे.वसमतमध्येही शिवसेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा व राष्ट्रवादीचे राजू नवघरे यांच्यातच लढतीची अपेक्षा होती.भाजपचे बंडखोर अ‍ॅड.शिवाजी जाधव यांची एन्ट्री शिवसेनेची तर वंचितचे मुनीर पटेल हे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवणारी आहे.  

हिंगोलीत सर्वात कमी अर्ज : हिंगोलीत भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचितचे वसीम देशमुख यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी १७ जणांचे अर्ज या मतदारसंघातच आले आहेत. येथेही काँग्रेसच्या गट-तटाच्या भिंती कायम आहेत. शिवसेनेतर्फे रामेश्वर शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hingoliहिंगोलीbasmath-acबासमथkalamnuri-acकलामनीरी