शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:31 IST

बंडखोरीचे पीक आल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे

ठळक मुद्देहिंगोलीत सर्वात कमी अर्ज

- विजय पाटील 

हिंगोली : जिल्ह्यात वसमत व कळमनुरीत बंडखोरीचे पीक आल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.  कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे संतोष बांगर व काँग्रेसचे संतोष टारफे या दोन प्रमुख उमेदवारांत अटीतटीचा सामना रंगणार आहे. त्यात वंचितकडून अजित मगर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. 

या मतदारसंघात अजूनही काँग्रेसची बरीचशी मंडळी सक्रियच नाही. खा.राजीव सातव यांनीही उमेदवारी जाहीर केल्यानंतर फारसे लक्ष घातले नाही. अर्ज भरण्यासाठी ते हिंगोलीत फिरकले नाहीत. कळमनुरीत मात्र त्यांनी नावालाच हजेरी लावली. त्याचाही परिणाम म्हणून इतर मंडळी संभ्रमात दिसत आहे. 

भाजपचे अ‍ॅड. शिवाजी माने व गजानन घुगे यांनी बंडखोरीची भाषा चालविली आहे. मात्र सेनेकडून मनधरणीही जोरात सुरू आहे. त्यात अपयश आले तर लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे.वसमतमध्येही शिवसेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा व राष्ट्रवादीचे राजू नवघरे यांच्यातच लढतीची अपेक्षा होती.भाजपचे बंडखोर अ‍ॅड.शिवाजी जाधव यांची एन्ट्री शिवसेनेची तर वंचितचे मुनीर पटेल हे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवणारी आहे.  

हिंगोलीत सर्वात कमी अर्ज : हिंगोलीत भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचितचे वसीम देशमुख यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी १७ जणांचे अर्ज या मतदारसंघातच आले आहेत. येथेही काँग्रेसच्या गट-तटाच्या भिंती कायम आहेत. शिवसेनेतर्फे रामेश्वर शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hingoliहिंगोलीbasmath-acबासमथkalamnuri-acकलामनीरी