शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra Election 2019 : कळमनुरीत बंड शमले, वसमतमध्ये कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 18:20 IST

डखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची वरिष्ठ मंडळी कामाला लागली होती.

ठळक मुद्देहिंगोली मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणातवसमतमध्ये चौरंगी लढत

- विजय पाटील 

हिंगोली : विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपच्या बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची वरिष्ठ मंडळी कामाला लागली होती. त्यात कळमनुरीतील भाजप बंडखोरांनी माघार घेतली असली तरीही वसमतला मात्र बंड कायम राहिले. हिंगोलीतून सेनेच्या बंडखोराने माघार घेतली.  

या निवडणुकीपूर्वी युती होणार नसल्याच्याच चर्चा होत्या. त्याच अनुषंगाने मतदारसंघ शिवसेनेला असताना कळमनुरीवसमतमध्ये भाजपची तर हिंगोली भाजपला असताना शिवसेनेची तयारी सुरू होती. युती न झाल्याने प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे यांनी कळमनुरीतून अपक्ष निवडणूक लढण्याचा चंग बांधला होता. त्यांना रासपचे विनायक भिसेही साथ द्यायला निघाले होते. तर वंचितने उमेदवारी न दिल्याने डॉ.दिलीप मस्केही रिंगणात राहण्याची तयारी करीत होते. या सर्व बाबी शिवसेनेची डोकेदुखी ठरल्या होत्या. मात्र शेवटच्या दिवशी झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर या सर्वच दिग्गजांनी माघार घेतली. त्यामुळे मार्ग सुकर झाल्याने सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा जीव भांड्यात पडला आहे. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांच्या एंट्रीने काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारसंघात तब्बल दहा जणांनी माघार घेतली असून फक्त सात जण रिंगणात आहेत. त्यामुळे तगडी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

हिंगोली मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणातहिंगोली मतदारसंघात भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचित बहुजन आघाडीचे वसीम देशमुख, बसपाचे सुरेश गायकवाड यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे इतर पक्षीय व अपक्षांमुळे लढतीतील रंगत वाढणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे रामेश्वर शिंदे यांनी दबावतंत्र म्हणून दाखल केलेली उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली आहे.

वसमतमध्ये चौरंगी लढतवसमत विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादीचे राजू नवघरे, वंचित बहुजन आघाडीचे शेख फरीद तसेच भाजप बंडखोर तथा अपक्ष शिवाजीराव जाधव या दिग्गजांना आता जिवाचे रान करावे लागणार आहे. या मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी ९ जणांनी माघार घेतल्यानंतर १२ जण रिंगणात राहणार आहेत. इतर अपक्ष उमेदवारांमुळे कोणाच्या पायावर धोंडा पडतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपची बहुतांश यंत्रणा जाधव यांच्या मागे उभी राहिली. तर राष्ट्रवादीतील असंतुष्टांचा गट उद्या नेमका काय निर्णय घ्यायचा, हे ठरविणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hingoliहिंगोलीhingoli-acहिंगोलीkalamnuri-acकळमनुरीbasmath-acवसमत