शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Election 2019 : कळमनुरीत बंड शमले, वसमतमध्ये कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 18:20 IST

डखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची वरिष्ठ मंडळी कामाला लागली होती.

ठळक मुद्देहिंगोली मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणातवसमतमध्ये चौरंगी लढत

- विजय पाटील 

हिंगोली : विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपच्या बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची वरिष्ठ मंडळी कामाला लागली होती. त्यात कळमनुरीतील भाजप बंडखोरांनी माघार घेतली असली तरीही वसमतला मात्र बंड कायम राहिले. हिंगोलीतून सेनेच्या बंडखोराने माघार घेतली.  

या निवडणुकीपूर्वी युती होणार नसल्याच्याच चर्चा होत्या. त्याच अनुषंगाने मतदारसंघ शिवसेनेला असताना कळमनुरीवसमतमध्ये भाजपची तर हिंगोली भाजपला असताना शिवसेनेची तयारी सुरू होती. युती न झाल्याने प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे यांनी कळमनुरीतून अपक्ष निवडणूक लढण्याचा चंग बांधला होता. त्यांना रासपचे विनायक भिसेही साथ द्यायला निघाले होते. तर वंचितने उमेदवारी न दिल्याने डॉ.दिलीप मस्केही रिंगणात राहण्याची तयारी करीत होते. या सर्व बाबी शिवसेनेची डोकेदुखी ठरल्या होत्या. मात्र शेवटच्या दिवशी झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर या सर्वच दिग्गजांनी माघार घेतली. त्यामुळे मार्ग सुकर झाल्याने सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा जीव भांड्यात पडला आहे. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांच्या एंट्रीने काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारसंघात तब्बल दहा जणांनी माघार घेतली असून फक्त सात जण रिंगणात आहेत. त्यामुळे तगडी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

हिंगोली मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणातहिंगोली मतदारसंघात भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचित बहुजन आघाडीचे वसीम देशमुख, बसपाचे सुरेश गायकवाड यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे इतर पक्षीय व अपक्षांमुळे लढतीतील रंगत वाढणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे रामेश्वर शिंदे यांनी दबावतंत्र म्हणून दाखल केलेली उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली आहे.

वसमतमध्ये चौरंगी लढतवसमत विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादीचे राजू नवघरे, वंचित बहुजन आघाडीचे शेख फरीद तसेच भाजप बंडखोर तथा अपक्ष शिवाजीराव जाधव या दिग्गजांना आता जिवाचे रान करावे लागणार आहे. या मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी ९ जणांनी माघार घेतल्यानंतर १२ जण रिंगणात राहणार आहेत. इतर अपक्ष उमेदवारांमुळे कोणाच्या पायावर धोंडा पडतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपची बहुतांश यंत्रणा जाधव यांच्या मागे उभी राहिली. तर राष्ट्रवादीतील असंतुष्टांचा गट उद्या नेमका काय निर्णय घ्यायचा, हे ठरविणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hingoliहिंगोलीhingoli-acहिंगोलीkalamnuri-acकळमनुरीbasmath-acवसमत