शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Maharashtra Election 2019 : भाजप बंडखोरामुळे सर्वांचीच दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 20:29 IST

राष्ट्रवादी व शिवसेनेत असंतुष्ट वाढले, मनधरणीसाठी उमेदवारही धजेनात

- दयाशील इंगोले

वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड.शिवाजीराव जाधव यांच्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी या सर्वांच्याच मतांवर ते डल्ला मारत असल्याने इतरांना विजयाचे गणित लावणेच अवघड बनले आहे.

लोकसभेसाठी वसमत विधानसभेतील भाजपचे अ‍ॅड.शिवाजी जाधव व सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा हे दोघेही इच्छुक होते. मुंदडा यांचे तिकीट कापून हेमंत पाटील लढले. पाटील यांनी जाधव यांची मनधरणी करून माघार घ्यायला लावली. त्यानंतर जाधव यांनी साथ दिली. मात्र मुंदडा यांच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी प्रत्येकच लोकसभेला सेनाविरोधी काम करायचे असेल तर विधानसभेत आम्ही कशाला झटायचे, असा सवाल करीत अपक्ष जाधव यांच्यामागे शक्ती उभी केली.  मात्र मुंदडा हे एकटे फिरून जादू दाखवितात, यावरच उरलेल्या शिवसैनिकांना विश्वास वाटत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे राजू नवघरे हे नवखे असले तरी युवकांत क्रेझ असलेले उमेदवार आहेत. मात्र राष्ट्रवादीतील एक मोठा गट त्यांच्यापासून दुरावला. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे मुनीर पटेल हे प्रभावी असल्याने त्याचाही फटका सोसावा लागत आहे.

भाजपचे बंडखोर असलेले अपक्ष अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना इतरांकडून होणाऱ्या मदतीसोबतच भाजपचेही बळ मिळत आहे. यामुळे लोकसभेत महायुतीला मिळालेल्या मतांवरून या मतदारसंघाचे गणित लावणे चुकीचे ठरणार आहे. येथे महायुती १,00,८६९, आघाडी- ५२६४६ तर वंचितला ३३,३४८ मते होती. तर जाधव यांनी सर्वांचेच गणित बिघडविल्याने या मतदारसंघातील ही विचित्र परिस्थिती निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल, असे दिसत आहे. 

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- या मतदारसंघात वसमत तालुक्यातील बहुतांश भाग हा तीन वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे सिंचनाखाली येतो. मात्र दुष्काळ व हे प्रकल्प भरत नसल्याने मागील तीन वर्षांपासून गोची होत आहे. त्यामुळे सिंचन वाढीचे उपाय करावे लागणार आहेत. अर्ध्या भागात तर नव्याने सोयी निर्माण कराव्या लागतील.- मोठी व चांगली बाजारपेठ असूनही आवश्यक सुविधांचा अभाव आहे. उद्योगवाढीसाठी वाव असतानाही त्यादृष्टीने फारसे प्रयत्न होत नाहीत. बेरोजगारीचे प्रमाणही बरेच असून स्थानिकला रोजगार मिळणे गरजेचे आहे.- या मतदारसंघात कृषीपूरक उद्योगांना वाव आहे. मात्र काही ठरावीक सोडले तर त्याला व्यापक रुप देता आले नाही. हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. त्या दिशेने काही करण्याची गरज आहे. अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. शहरी भागाच्या विकासातची अपेक्षित कामगिरी झाली नसल्याने बकालावस्था दिसत आहे.

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजू

जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)चारवेळा आमदार, एकदा मंत्री राहिल्याने तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे आहे.मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव असून त्यावर सातत्याने बोलत असतात.कायम ‘एकला चलो रे’ची भूमिका वापरूनच यश मिळवत आले आहेत.

राजू नवघरे (राष्ट्रवादी)युवकांमध्ये क्रेझ असलेला नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.विविध सामाजिक उपक्रम राबवून सामान्यांमध्ये ओळख निर्माण केली.सहकारात काम करण्याचा तरुण वयातच अनुभव असल्याचा फायदा.

मुनीर पटेल (वंचित)राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिल्याने कायम जनसंपर्क राहिला.दमदार चेहरा म्हणून वंचितची मूळ मते आकर्षित करण्यात यश येत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते.

शिवाजी जाधव (अपक्ष)मागील निवडणुकीतील पराभवानंतरही शेतकऱ्यांना कायम साथ.टोकाई कारखाना, दूध डेअरीच्या माध्यमातून रोजगाराची संधीमागील निवडणुकीत पराभवानंतरही कार्यरत असल्याने सामान्यांत सहानुभूती.

2०14चे चित्र- जयप्रकाश मुंदडा (सेना-विजयी)  - जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी-पराभूत) 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019basmath-acवसमतHingoliहिंगोली