शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Maharashtra Election 2019 : भाजप बंडखोरामुळे सर्वांचीच दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 20:29 IST

राष्ट्रवादी व शिवसेनेत असंतुष्ट वाढले, मनधरणीसाठी उमेदवारही धजेनात

- दयाशील इंगोले

वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड.शिवाजीराव जाधव यांच्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी या सर्वांच्याच मतांवर ते डल्ला मारत असल्याने इतरांना विजयाचे गणित लावणेच अवघड बनले आहे.

लोकसभेसाठी वसमत विधानसभेतील भाजपचे अ‍ॅड.शिवाजी जाधव व सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा हे दोघेही इच्छुक होते. मुंदडा यांचे तिकीट कापून हेमंत पाटील लढले. पाटील यांनी जाधव यांची मनधरणी करून माघार घ्यायला लावली. त्यानंतर जाधव यांनी साथ दिली. मात्र मुंदडा यांच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी प्रत्येकच लोकसभेला सेनाविरोधी काम करायचे असेल तर विधानसभेत आम्ही कशाला झटायचे, असा सवाल करीत अपक्ष जाधव यांच्यामागे शक्ती उभी केली.  मात्र मुंदडा हे एकटे फिरून जादू दाखवितात, यावरच उरलेल्या शिवसैनिकांना विश्वास वाटत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे राजू नवघरे हे नवखे असले तरी युवकांत क्रेझ असलेले उमेदवार आहेत. मात्र राष्ट्रवादीतील एक मोठा गट त्यांच्यापासून दुरावला. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे मुनीर पटेल हे प्रभावी असल्याने त्याचाही फटका सोसावा लागत आहे.

भाजपचे बंडखोर असलेले अपक्ष अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना इतरांकडून होणाऱ्या मदतीसोबतच भाजपचेही बळ मिळत आहे. यामुळे लोकसभेत महायुतीला मिळालेल्या मतांवरून या मतदारसंघाचे गणित लावणे चुकीचे ठरणार आहे. येथे महायुती १,00,८६९, आघाडी- ५२६४६ तर वंचितला ३३,३४८ मते होती. तर जाधव यांनी सर्वांचेच गणित बिघडविल्याने या मतदारसंघातील ही विचित्र परिस्थिती निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल, असे दिसत आहे. 

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- या मतदारसंघात वसमत तालुक्यातील बहुतांश भाग हा तीन वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे सिंचनाखाली येतो. मात्र दुष्काळ व हे प्रकल्प भरत नसल्याने मागील तीन वर्षांपासून गोची होत आहे. त्यामुळे सिंचन वाढीचे उपाय करावे लागणार आहेत. अर्ध्या भागात तर नव्याने सोयी निर्माण कराव्या लागतील.- मोठी व चांगली बाजारपेठ असूनही आवश्यक सुविधांचा अभाव आहे. उद्योगवाढीसाठी वाव असतानाही त्यादृष्टीने फारसे प्रयत्न होत नाहीत. बेरोजगारीचे प्रमाणही बरेच असून स्थानिकला रोजगार मिळणे गरजेचे आहे.- या मतदारसंघात कृषीपूरक उद्योगांना वाव आहे. मात्र काही ठरावीक सोडले तर त्याला व्यापक रुप देता आले नाही. हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. त्या दिशेने काही करण्याची गरज आहे. अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. शहरी भागाच्या विकासातची अपेक्षित कामगिरी झाली नसल्याने बकालावस्था दिसत आहे.

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजू

जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)चारवेळा आमदार, एकदा मंत्री राहिल्याने तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे आहे.मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव असून त्यावर सातत्याने बोलत असतात.कायम ‘एकला चलो रे’ची भूमिका वापरूनच यश मिळवत आले आहेत.

राजू नवघरे (राष्ट्रवादी)युवकांमध्ये क्रेझ असलेला नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.विविध सामाजिक उपक्रम राबवून सामान्यांमध्ये ओळख निर्माण केली.सहकारात काम करण्याचा तरुण वयातच अनुभव असल्याचा फायदा.

मुनीर पटेल (वंचित)राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिल्याने कायम जनसंपर्क राहिला.दमदार चेहरा म्हणून वंचितची मूळ मते आकर्षित करण्यात यश येत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते.

शिवाजी जाधव (अपक्ष)मागील निवडणुकीतील पराभवानंतरही शेतकऱ्यांना कायम साथ.टोकाई कारखाना, दूध डेअरीच्या माध्यमातून रोजगाराची संधीमागील निवडणुकीत पराभवानंतरही कार्यरत असल्याने सामान्यांत सहानुभूती.

2०14चे चित्र- जयप्रकाश मुंदडा (सेना-विजयी)  - जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी-पराभूत) 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019basmath-acवसमतHingoliहिंगोली