शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

अंग झटकून काम होईना; रंगत चढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:51 IST

निवडणूक आठ दिवसांवर आली तरी अद्याप निवडणुकीचा प्रचार सुरूच झालेला दिसत नाही. वसमत शहरात तर निवडणुकीचे वारेही नाही. पक्षाचे कार्यकर्ते दूर- दूरच दिसतात. अंग झटकून काम करण्याची तयारी कोणीची नाही. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांच्याच ओळखी नसल्याने दुरावा स्पष्ट दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : निवडणूक आठ दिवसांवर आली तरी अद्याप निवडणुकीचा प्रचार सुरूच झालेला दिसत नाही. वसमत शहरात तर निवडणुकीचे वारेही नाही. पक्षाचे कार्यकर्ते दूर- दूरच दिसतात. अंग झटकून काम करण्याची तयारी कोणीची नाही. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांच्याच ओळखी नसल्याने दुरावा स्पष्ट दिसत आहे.मतदानाचा दिवस जवळ आला तरी अद्याप वसमत तालुक्यात जवळ रंग भरलेला दिसत नाही. प्रचारात दिसावे लागते म्हणून काही जण दिसतात. एवढेच ‘शक्कर’कशी येणार याची वाट पाहणारेही तटस्थ दिसतात. वसमत शहरात तर कार्यकर्ते अजूनही प्रचारात उतरतांना दिसत नाहीत. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांची ओळखीच नाहीत. ऐनवेळी उमेदवारीची बक्षिसी मिळालेल्या उमेदवारांना जो समोर येईल, त्याला आपलेसे करण्याशिवाय मार्ग नाही. उमेदवारासाठी जिवाचे रान करील, अशी यंत्रणा मात्र दिसत नाही. कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी कोणीही काहीच केलेले नाही. त्याचाही राग कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे दिसतो.जे सोबत येत आहेत त्याचा जनाधार किती हासुद्धा प्रश्न आहेच, गावागावातील समीकरणे गट- तट याचीही जाणीव नवख्या उमेदवारांना नाही. त्याचाही फटका प्रचाराला बसतो आहे. कार्यकर्त्यांपर्यंतच उमेदवार अजून पोहोचले नाहीत. तर मतदारांपर्यंत कधी पोहोचणार, हा प्रश्न आहे. मतदार मतदान करतातच त्यांना सांगायची काय गरज, अशी मानसिकता असणारे अनेक पदाधिकारी वसमतमध्ये आहेत. जे फक्त नेते व उमेदवारांच्या सोबत राहण्यात पटाईत असतात. उमेदवारांचा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली शिदोरी घरीच ठेवणारेही अनेकजण आहेत.एकंदरीत आतापर्यंत तरी उमेदवारांचा कोणताही प्रभाव प्रचारात दिसलेला नाही.वसमत शहरात तर बोटावर मोजण्याएवढेच काम करताना दिसतात. त्यातीलही अनकजण ‘शक्कर’वर लक्ष ठेवूनच असावेत. दोन्ही प्रमुख पक्षांचे न झेंडे दिसतात न बॅनर. मतदार संपर्क अभियानही दिसत नाही. फक्त पक्षाच्या भरवशावरच ही निवडणूक सुरू असल्याचे विचित्र वातावरण वसमतमध्ये पहावयास मिळते. मतदारांशी संपर्क न साधताही मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडतातच, ज्याला मत द्यायचे त्याला मत देतातच ज्यांच्यावर बुथची जबाबदारी असते त्याने पडलेली मते माझ्यामुळेच पडली, असे सांगण्याचीही वसमतमध्ये जुनी पद्धत आहे. बुथ प्लस राहिले तर माझ्यामुळे राहिले अन् मायनस राहिले तर एखाद्यावर खापर फोडण्याचीही पद्धत आहे. असे बुथ मॅनेजमेंट यावेळीही होते की काही वेगळा अनुभव पहावयास मिळतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण