शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विजेच्या धक्क्याने दोन कुटुंबांचे आधारस्तंभच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:06 IST

मयत दोघांच्याही कुटुंबियांचा आक्रोश मने हेलावणारा

ठळक मुद्दे पंधरा दिवसांत दुसरी घटना

वसमत : येथे मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचे काम करत असताना लोखंडी शिडी ११ के.व्ही. तारांना लागल्याने दोन जण ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत मयत झालेले दोघेही त्यांच्या कुटुंबाचे मुख्य आधार होते. या घटनेने दोन कुटूंब उघड्यावर आले. घटनास्थळी या कुटुंबियांचा आक्रोश सगळ्यांची मने हेलावून टाकणारा होता. 

वसमत येथे नव्याने होत असलेल्या श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या लोखंडी कमानीचे काम सुरू होते. या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केलेले विलास गिरमाजी पतंगे (५४, रा. सोमवारपेठ, वसमत) व सिद्धार्थ केशव वाघमारे (३५, रा.गणेशपूर वसमत) हे दोघे कर्मचारी विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. अति उच्च दाबाच्या तारांना लोखंडी शिडी स्पर्श झाली आणि क्षणातच त्यांच्या शरीराचा कोळसा झाला. मयतांपैकी विलास पतंगे हे शहरातील अन्य मंगल कार्यालयांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होते. अत्यंत गरीब कुटूंबातील असलेले पतंगे हेच त्यांच्या कुटूंबाचा आधार होते. हे मंगल कार्यालय नव्याने झाल्याने ते तेथे रूजू झाले होते. उत्साहात मंगल कार्यालयाच्या बांधकामापासून त्यांनी काम पाहिले. मात्र मंगल कार्यालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, २ मुली असा परिवार आहे. 

या दुर्घटनेत मयत झालेला दुसरा तरूण सिद्धार्थ केशव वाघमारे (३५) हा गणेशपूर येथील रहिवासी आहे. अत्यंत गरीब कुटूंबातील मनमिळावू व्यक्तीमत्व व कष्टाळू तरूण मंगल कार्यालयात कर्मचारी म्हणून नियुक्त झाला. त्याच्या पश्चात पत्नी, ३ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. सिद्धार्थ वाघमारे हाच घराचा आधार होता. आता त्यांचे कुटूंब वाऱ्यावर सापडले आहे. विजेच्या धक्क्याने दोन जीव घेतले. सोबत दोन कुटुंबही उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी दोन्ही मयताचे कुटूंबिय दाखल झाले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश सुन्न करणारा होता. प्रत्येकाचे डोळे पाणावणारा हा प्रसंग हृदय हेलावून टाकणारे होते. मयत कुटूंबियांना मदत व्हावी, अशी अपेक्षा प्रत्येकजण व्यक्त करत होता. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि बळीराम बंदखडके यांनी केला. हे दोन्ही अधिकारी तत्परतेने घटनास्थळी धावले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

पंधरा दिवसांत दुसरी घटनाकुरूंदा येथेही शिडी तारांना लागून दोन जण ठार झाले होते. पंधरा दिवसांपूर्वीच कुरूंदा येथे नवीन दुकानावर नाव काढण्यासाठी शिडी लावत असताना शिडी तारांना लागली व दोन जण जागीच ठार झाले होते. कुरूंदा व वसमत येथील दोन्ही घटनांत साम्य आहे. दोन्ही जागी शिडी तारांना लागून दुर्घटना झाली. पंधरा दिवसांतीलच या दोन घटनांत वसमत तालुक्यात चौघांचा बळी गेला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीelectricityवीज