शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशाचा सणही यंदा अंधारातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:50 IST

जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे. ही समस्या इतकी गंभीर बनली की, अधिकारी व पुढारीही वैतागले आहेत.गेल्या काही दिवसांपासून रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा रबीच्या हंगामाची सुतराम शक्यता नाही. मात्र काही भागात थोडेबहुत पाणी उपलब्ध आहे. धरणे, तलावांचा आधार आहे, अशांनाही पाणी घेण्यासाठी वीजप्रश्न आडवा येत आहे. अनेक ठिकाणी तर गावातच अंधार पसरलेला आहे. दिवाळीचा सण सुरू झाला तरीही रोहित्र दिले जात नाही. त्यामुळे अशा गावांतील लोकांचा आक्रमकपणा महावितरणच्या कार्यालयात पहायला मिळत आहे. शनिवारी प्रतीक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर असूनही रोहित्र दिले जात नाही. मागील तीन दिवसांपासून चकरा मारूनही अधिकारी दाद देत नाहीत, साधी भेटही देत नाहीत म्हणून कळमनुरी तालुक्यातील जांभरुणचे शेतकरी ओरड करीत होते. यावर झालेला खर्च कोणी भरायचा? असा त्यांचा मुद्दा होता. तरीही त्यांना सोमवारी या असे सांगून सर्वांनीच भेट नाकारली, हे विशेष. मग ही प्रतीक्षा यादी काय नावालाच आहे का? रोहित्रांचे आज काहीच जॉब निघाले नाही का? बाहेरूनच रोहित्र बदलून देण्याचा धंदा अधिकाऱ्यांनी सुरू केला का? अशी बोंब हे शेतकरी ठोकत होते. त्यानंतर गोरेगाव या राजकीय राजधानीतील शेतकरीही बाहेरच जोरात येताना दिसत होते. अधिकारी मात्र त्यांनाही भेट देत नसल्याने त्यांची तगमग पाहण्यासारखी होती. दिवाळीच्या तोंडावरही रोहित्र मिळणार नसेल तर हा काय कारभार चालू आहे, असे या ग्रामस्थांचे म्हणने होते.याशिवाय शेतीसाठी रोहित्र मागणारे तर महावितरणच्या दारातच ठाण मांडून होते. मात्र गेटपास देण्यासच कोणी तयार नसल्याने अनेकांनी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहून घराचा रस्ता धरला. आता दिवाळी अंधारातच काढावी लागणार असून यंदा शेतीचीही माती होणार असल्याची ओरड हे शेतकरी करताना दिसत होते. एकंदर रोहित्रांचा प्रश्न गंभीर असल्याचेच दिसत आहे.अशा आहेत याद्या : प्रतीक्षा कायमच३ नोव्हेंबरच्या प्रतीक्षा यादीत थ्री फेजच्या १00 केव्हीएच्या जळालेल्या रोहित्रांच्या यादीत ८२ गावे आहेत. यापैकी ६0 पूर्ण रक्कम भरलेली आहेत. तर ६३ केव्हीएच्या यादीत ९९ गावे असून पूर्ण रक्कम भरलेली ५९ गावे आहेत. याशिवाय गावठाणच्या ६३ केव्हीएच्या १९ तर १00 केव्हीएच्या १४ डीपी प्रतीक्षा यादीत आहेत. तर २५ केव्हीएच्या जळालेल्या डीपींची संख्या ९७ आहे. त्यामुळे साडेतीनशेच्या आसपास जळालेल्या डीपींची दुरुस्ती दिवाळीपूर्वी शक्य नसून गावठाणातील डीपीही मिळतील की नाही? ही शंका आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण