शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

प्रकाशाचा सणही यंदा अंधारातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:50 IST

जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे. ही समस्या इतकी गंभीर बनली की, अधिकारी व पुढारीही वैतागले आहेत.गेल्या काही दिवसांपासून रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा रबीच्या हंगामाची सुतराम शक्यता नाही. मात्र काही भागात थोडेबहुत पाणी उपलब्ध आहे. धरणे, तलावांचा आधार आहे, अशांनाही पाणी घेण्यासाठी वीजप्रश्न आडवा येत आहे. अनेक ठिकाणी तर गावातच अंधार पसरलेला आहे. दिवाळीचा सण सुरू झाला तरीही रोहित्र दिले जात नाही. त्यामुळे अशा गावांतील लोकांचा आक्रमकपणा महावितरणच्या कार्यालयात पहायला मिळत आहे. शनिवारी प्रतीक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर असूनही रोहित्र दिले जात नाही. मागील तीन दिवसांपासून चकरा मारूनही अधिकारी दाद देत नाहीत, साधी भेटही देत नाहीत म्हणून कळमनुरी तालुक्यातील जांभरुणचे शेतकरी ओरड करीत होते. यावर झालेला खर्च कोणी भरायचा? असा त्यांचा मुद्दा होता. तरीही त्यांना सोमवारी या असे सांगून सर्वांनीच भेट नाकारली, हे विशेष. मग ही प्रतीक्षा यादी काय नावालाच आहे का? रोहित्रांचे आज काहीच जॉब निघाले नाही का? बाहेरूनच रोहित्र बदलून देण्याचा धंदा अधिकाऱ्यांनी सुरू केला का? अशी बोंब हे शेतकरी ठोकत होते. त्यानंतर गोरेगाव या राजकीय राजधानीतील शेतकरीही बाहेरच जोरात येताना दिसत होते. अधिकारी मात्र त्यांनाही भेट देत नसल्याने त्यांची तगमग पाहण्यासारखी होती. दिवाळीच्या तोंडावरही रोहित्र मिळणार नसेल तर हा काय कारभार चालू आहे, असे या ग्रामस्थांचे म्हणने होते.याशिवाय शेतीसाठी रोहित्र मागणारे तर महावितरणच्या दारातच ठाण मांडून होते. मात्र गेटपास देण्यासच कोणी तयार नसल्याने अनेकांनी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहून घराचा रस्ता धरला. आता दिवाळी अंधारातच काढावी लागणार असून यंदा शेतीचीही माती होणार असल्याची ओरड हे शेतकरी करताना दिसत होते. एकंदर रोहित्रांचा प्रश्न गंभीर असल्याचेच दिसत आहे.अशा आहेत याद्या : प्रतीक्षा कायमच३ नोव्हेंबरच्या प्रतीक्षा यादीत थ्री फेजच्या १00 केव्हीएच्या जळालेल्या रोहित्रांच्या यादीत ८२ गावे आहेत. यापैकी ६0 पूर्ण रक्कम भरलेली आहेत. तर ६३ केव्हीएच्या यादीत ९९ गावे असून पूर्ण रक्कम भरलेली ५९ गावे आहेत. याशिवाय गावठाणच्या ६३ केव्हीएच्या १९ तर १00 केव्हीएच्या १४ डीपी प्रतीक्षा यादीत आहेत. तर २५ केव्हीएच्या जळालेल्या डीपींची संख्या ९७ आहे. त्यामुळे साडेतीनशेच्या आसपास जळालेल्या डीपींची दुरुस्ती दिवाळीपूर्वी शक्य नसून गावठाणातील डीपीही मिळतील की नाही? ही शंका आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण