शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाण्यासाठी वानराचा जीव अडकला तांब्यात; दोन दिवसानंतर ग्रामस्थांच्या प्रयत्नाने झाली सुटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 13:34 IST

घोट-घोट पाण्यासाठी वानरांच्या टोळ्या सैरावैरा फिरत आहेत.

वसमत (जि. हिंगोली) : घोट-घोट पाण्यासाठी वानरांच्या टोळ्या सैरावैरा फिरत आहेत. याच शोधातून वसमत तालुक्यातील दारेफळ येथे वानराच्या एका पिलाचे डोके तांब्यात अडकले. दोन दिवस तो याच अवस्थेत फिरला. त्याच्या जीवावर बेतणार असल्याने ग्रामस्थांनी वनविभाग व प्राणिमित्राच्या साह्याने मोठ्या प्रयत्नानंतर त्याची सुटका केली. 

दुष्काळामुळे यंदा वसमत तालुक्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहेत. माणसांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तेथे वन्यप्राण्यांची अवस्था तर फार वाईट आहे. जंगल, शेतशिवारात फिरूनही पाणी मिळत नसल्याने वानरे गावात येत आहेत. वानरांच्या टोळीतील एका पिल्लाने दारेफळ येथे तांब्याच्या तळाला असलेले घोटभर पाणी पिण्यासाठी त्यात तोंड घातले. मात्र नंतर ते तांब्यात अडकून पडले. त्याच्या मातेने तांब्या काढायचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न निष्फळ ठरत होते. ती पिलापाशी कुणाला जाऊही देत नव्हती. तोंड अडकल्याने पिलाचे अन्न-पाणी बंद पडले अन् उपाशीपोटी त्याच्या चित्कारण्याने ग्रामस्थांची झोप उडाली. अखेर काही जणांनी वनविभागाशी संपर्क साधला. 

बुधवारी वन विभागाचे बीट गार्ड अंगद एनले, व्ही.एन.बुच्चाले, वसमत येथील वन परिक्षेत्र अधिकारी कच्छवे हे प्राणीमित्र विकी दयाळ यांच्यासह  पोहोचले. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पिलास आईपासून विभक्त करून त्यास पकडले. चार तासांच्या प्रयत्नानंतर ग्रामस्थ, वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणिमित्राच्या सहकाऱ्याने त्या पिलाची अडकलेल्या तांब्यापासून मुक्तता करण्यात आली.

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्यात शोधार्थ वानरे व जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणवठे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. - जयसिंग कछवे, वनपरिक्षेत्र अधिकारी

पहा व्हिडिओ :

टॅग्स :MonkeyमाकडWaterपाणी