शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

भूसंपादन झाले; मात्र सातबारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:37 IST

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना अदा केल्यानंतरही त्या जमिनी अजून त्यांच्याच नावे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना बजावल्यानंतरही कार्यवाही थंडच असल्याने आता नोटिसा बजावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना अदा केल्यानंतरही त्या जमिनी अजून त्यांच्याच नावे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना बजावल्यानंतरही कार्यवाही थंडच असल्याने आता नोटिसा बजावल्या आहेत.जिल्ह्यात दोन मोठ्या प्रकल्पांसह २६ लघुसिंचन प्रकल्पांसाठी शेतकºयांची हजारो हेक्टर जमीन संपादित केली आहे. याशिवाय रस्ते, रेल्वे मार्ग व इतर अनेक बाबींसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचेही वेगळे आकडे आहेत. मात्र या सगळ्या जमिनी शासनाच्या नावावरच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यात अनेक ठिकाणच्या तलाठ्यांनी भूसंपादन प्रक्रिया झाल्यानंतरही त्यात पुढील कारवाई केली नाही. तहसीलदारांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. उपविभागीय अधिकाºयांच्या तपासण्यांतही आतापर्यंत या बाबीकडे गांभिर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे या जमिनी शेतकºयांच्याच नावे राहिल्या आहेत. जर हा प्रकार असाच राहिला तर भविष्यात अशा जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी यात लक्ष घालून या जमिनी शासनजमा करण्यास बजावले होते. त्याचा कोणताच परिणाम न झाल्याने त्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.हिंगोलीचे परभणीपासून विभाजन झाले तेव्हा १0८६ निवाड्यात हजारो हेक्टर जमिनींचे भूसंपदान झाले होते. तालुकानिहाय निवाड्यांची संख्या वसमत-१७७,हिंगोली १९६, औंढा-११९, सेनगाव- १0३ तर कळमनुरी-४६६ अशी एकूण १0६१ एवढी आहे. त्यानंतरच्या काळातही हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी २0८ निवाड्यांमध्येही हजारो हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. नव्याने लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आदीसाठी जमिनींचे भूसंपादन होत आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीLand Roverलँड रोव्हर