शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भूसंपादन झाले; मात्र सातबारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:37 IST

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना अदा केल्यानंतरही त्या जमिनी अजून त्यांच्याच नावे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना बजावल्यानंतरही कार्यवाही थंडच असल्याने आता नोटिसा बजावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना अदा केल्यानंतरही त्या जमिनी अजून त्यांच्याच नावे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना बजावल्यानंतरही कार्यवाही थंडच असल्याने आता नोटिसा बजावल्या आहेत.जिल्ह्यात दोन मोठ्या प्रकल्पांसह २६ लघुसिंचन प्रकल्पांसाठी शेतकºयांची हजारो हेक्टर जमीन संपादित केली आहे. याशिवाय रस्ते, रेल्वे मार्ग व इतर अनेक बाबींसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचेही वेगळे आकडे आहेत. मात्र या सगळ्या जमिनी शासनाच्या नावावरच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यात अनेक ठिकाणच्या तलाठ्यांनी भूसंपादन प्रक्रिया झाल्यानंतरही त्यात पुढील कारवाई केली नाही. तहसीलदारांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. उपविभागीय अधिकाºयांच्या तपासण्यांतही आतापर्यंत या बाबीकडे गांभिर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे या जमिनी शेतकºयांच्याच नावे राहिल्या आहेत. जर हा प्रकार असाच राहिला तर भविष्यात अशा जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी यात लक्ष घालून या जमिनी शासनजमा करण्यास बजावले होते. त्याचा कोणताच परिणाम न झाल्याने त्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.हिंगोलीचे परभणीपासून विभाजन झाले तेव्हा १0८६ निवाड्यात हजारो हेक्टर जमिनींचे भूसंपदान झाले होते. तालुकानिहाय निवाड्यांची संख्या वसमत-१७७,हिंगोली १९६, औंढा-११९, सेनगाव- १0३ तर कळमनुरी-४६६ अशी एकूण १0६१ एवढी आहे. त्यानंतरच्या काळातही हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी २0८ निवाड्यांमध्येही हजारो हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. नव्याने लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आदीसाठी जमिनींचे भूसंपादन होत आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीLand Roverलँड रोव्हर