शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जुलैमध्ये २४ लाख वृक्ष लागवडीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:07 IST

१३ कोटी वृक्ष लागवड सन २०१८ अंतर्गत जुलै महिन्यात २४ लाख ३२ हजार ६१८ रोपांची लागवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले जात असून संबंधित विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : १३ कोटी वृक्ष लागवड सन २०१८ अंतर्गत जुलै महिन्यात २४ लाख ३२ हजार ६१८ रोपांची लागवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले जात असून संबंधित विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.पर्यावरण रक्षणासाठी वने आणि वन्यजीवांच्या सुरक्षितेसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शासनाने २०१७, २०१८ व २०१९ या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपण व संगोपनाचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून २०१८ च्या पावसाळ्यामध्ये ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात वृक्षलागवडीची चळवळ उभी केली जात आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.रोपांचे संगोपन- शासनाकडून वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. शिवाय यासंदर्भात प्रशासकीय विभागांना सूचना व नियोजन करून दिले जात आहे. परंतु आतापर्यंत लागवड केलेल्या रोपांची संगोपण कोणत्या विभागाने किती प्रमाणात केले यासंदर्भातही माहिती एकत्रित करून शासनाकडे पाठविण्याचीही आवश्यकता आहे. ज्यामुळे प्रत्येक विभाग रोपांचे संगोपन करण्यास दिरंगाई करणार नाही.हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या रोपांपैकी जवळपास ७५ ते ८० टक्के रोपांचे संगोपन करण्यात आल्याची माहिती विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी दिली. शिवाय याबाबत संबधित प्रशासकीय विभागाकडून माहितीही मागविली जाईल, असेही ते म्हणाले.जिल्ह्यात ४९ रोपवाटिका असून त्यात ४५ लाख रोपे आहेत. हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत दीड लाखांच्या जवळपास रोपांची निगा राखली जात आहे. रोपांसाठी विहीर व बोअरच्या पाण्याची सुविधा आहे. परंतु येथे कार्यरत १८ महिलांच्या मानधनाचा प्रश्न गंभीर आहे. मानधन दर महिन्याला मिळत नाही. मानधन महिन्याला द्यावे, अशी मागणी आहे.वन विभागातर्फे ९ लाख ५१ हजार ३१८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग ६ लाख ४८ हजार, ग्रामपंचायत ५ लाख ५४ हजार २८८ तसेच इतर विभाग यामध्ये कृषि विभागातर्फे २ लाख १० हजार २७०, जि. प. ग्राम विकास विभाग २ हजार ६४२, महसूल विभाग ३७१५, सार्वजनिक बांधकाम विभाग ८६१५, गृहविभाग ६२४०, राज्य राखीव पोलीस बलगट क्र. १२-६०००, जलसंपदा विभाग १८१०, उपनिबंधक सहकार व पणन विभाग ४६२०, शिक्षण संस्था १४६५, उच्च व तंत्र शिक्षण विभाग ६९०, आदिवासी विकास विभाग ८६०, सामाजिक न्याय ३४५, सार्वजनिक आरोग्य विभाग २८८०, उर्जा विभाग, १६०५, सर्व आगारप्रमुख ८३५, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय २००, न्याय विभाग १७०, महिला व बालविकास अधिकारी १७५, मुख्याधिकारी हिंगोली तसेच कळमनुरी, वसमत, सेनगाव औंढा नगरपंचायत ७८७५ याप्रमाणे वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.वृक्षलागवडीसंदर्भात बैठकीचे आयोजन४१३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे २ जून रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी संबधित प्रशासकीय यंत्रणांनी बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागप्रुखांना बैठकीस उपस्थित राहावे लागणार असून नियोजन केले जात आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीenvironmentवातावरण