शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

११ ते १७ जुलै तापमान सरासरीएवढेच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

जिल्ह्यात ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाला नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. मूग, उडीद, भुईमूग आदी पिके वगळता ...

जिल्ह्यात ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाला नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. मूग, उडीद, भुईमूग आदी पिके वगळता इतर पिकांची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. मूग, उडीद, भुईमूग पिकांची पेरणी ७ जुलैनंतर करू नये, असेही विद्यापीठाने शेतकऱ्यांना कळविले आहे. कापूस पिकाची लागवड १५ जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून घ्यावी. नंतर बीजप्रकिया करूनच कापसाची लागवड करावी.

गादी वाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाल्याच्या रोपांना ४५ दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून घ्यावा. टोमॅटो, वांगी, मिरची या पिकांची पुनर्लागवड करून घ्यावी, असेही आवाहन विद्यापीठाने केले आहे.

शेळ्या, मेंढ्या उघड्यावर बांधू नयेत

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शेळ्या, मेंढ्यांना उघड्यावर बांधू नये. पावसात भिजल्यास शेळ्या, मेंढ्यांना आजार होऊ शकतो. विशेष म्हणजे शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फुसाचा आजार होण्याची शक्यता असते. तसेच दलदल जमिनीमुळे खूर सडण्याची शक्यता असते. परिणामी अनेक समस्या उद्‌भवू शकतात.