शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आंतरजातीय विवाह; १७ जोडप्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:12 IST

जातीपातीच्या भिंती तोडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून दरवर्षी अर्थसहाय्य केले जाते. २०१७-१८ या वर्षात जि. प. समाजकल्याणतर्फे आंतरजातीय विवाह करणाºया १७ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. चालू आर्थिक वर्षात केवळ ८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जातीपातीच्या भिंती तोडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून दरवर्षी अर्थसहाय्य केले जाते. २०१७-१८ या वर्षात जि. प. समाजकल्याणतर्फे आंतरजातीय विवाह करणाºया १७ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. चालू आर्थिक वर्षात केवळ ८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना प्रोत्साहनपर शासनाकडून अनुदान दिले जाते. त्या अनुषंगाने हिंगोली जि. प. समाजकल्याणतर्फे गतवर्षी एकूण १७ जोडप्यांना आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. समाजात सवर्ण आणि मागासवर्गीय असा भेदभाव दूर व्हावा व या दृष्टिकोनातून शासनाने ही योजना सुरू केली आहे. समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्सहनपर रक्कम दिली जाते. पूर्वी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना १५ हजार रुपये अनुदान देय होते. यात बदल करून शासनाने रक्कमेत वाढ केली असून आता लाभाची रक्कम ५० हजार रुपये दिली जात आहे. अशा जोडप्यांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी जि.प.च्या समाजकल्याण अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सोबत विवाह नोंदणी दाखला, वधू-वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीच्या दाखल्याच्या साक्षांकित प्रती जोडणे गरजेचे आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आंतरजातीय विवाहाची नोंदणी संबंधित विवाह नोंदणी अधिकाºयाकडे असणे आवश्यक आहे. वधूचे वय १८ वर्ष आणि वराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे आदी अटी आहेत.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक