शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोना महामारीमुळे ‘मानसिक’ ताण वाढला आहे, आता जगायचे कसे? असा प्रश्न विचारताना अनेक जण पाहायला मिळत आहेत. ...

हिंगोली : कोरोना महामारीमुळे ‘मानसिक’ ताण वाढला आहे, आता जगायचे कसे? असा प्रश्न विचारताना अनेक जण पाहायला मिळत आहेत. अशा मानसिक समस्यांना वेळीच गरज भासल्यास समुपदेशनाची आवश्यकता असते व वेळ पडल्यास औषधोपचार करण्याचीही गरज असते, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

ज्या व्यक्तींना चिंता, ताणतणाव, नैराश्य यासारखे प्रश्न भेडसावतात, अशा व्यक्तींनी वेळीच मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे योग्य ठरते. कोरोना महामारीमुळे दुर्दैवाने काही लोकांचे काम हिरावले आहे. काहींचा व्यवसाय अडचणीत आला आहे, काहींची नोकरीही गेली आहे. त्यामुळे त्या व्यक्तींना नैराश्य येणे साहजिकच आहे. तेव्हा या संकटाला घाबरून जाऊ नये. धीर न सोडता सामोरे जाणे हे अगत्याचे आहे. वेळ पडल्यास ज्या व्यक्तींना मानसिक ताणतणाव किंवा चिंता अशी लक्षणे वाटत असल्यास त्यांनी वेळीच शहरातील समुपदेशन केंद्राची मदतही घेतल्यास ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

तरुणांनी घाबरून जाऊ नये...

तरुण मंडळींनी कोरोना संकटाला न घाबरता त्याचा धैर्याने मुकाबला करणे आवश्यक आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम काटेकोरपणे पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊन आपले जीवन पूर्ववत होईल. यासाठी धीटपणाने अशा व्यक्तींनी कोरोनाला सामोरे जावे.

मनोरंजनाची साधने वापरणे....

लॉकडाऊनमध्ये हाताला काम राहिले नाही. कोरोना महामारीमुळे सद्य:स्थितीत घराबाहेर पडणे शक्य नाही. अशावेळी मनोरंजनाची साधने वापरणे व सतत कामात व्यस्त राहणे हे उपयुक्त ठरेल.

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा...

पुरुष किंवा महिला ज्या कोणाला ताणतणावाची लक्षणे दिसून येत असतील तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच उपयुक्त ठरेल.

समुपदेशन फायद्याचेच...

समुपदेशन केंद्रामध्ये तणावग्रस्त व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण केले जाते. एखादी व्यक्ती ताणतणावात असेल तर अशा व्यक्तीला औषधोपचार दिला जातो.

नोकरी गेली, व्यापार बुडाला, कामधंदा हातून गेला आहे, मी आता जगू शकत नाही आदी समस्या भेडसावू शकतात. अशा समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न मानसोपचारतज्ज्ञ मंडळी करतात, तसेच त्यांना योग्य दिशाही दाखविण्याचे कामही करती असतात.

डॉ. राहुल डोंगरे, मानसोपचारतज्ज्ञ, हिंगोली.