शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

निर्बंध कायम असताना बाजारपेठेत वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

हिंगोली जिल्ह्यात नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या बिनधास्तपणामुळेच कोरोनाचा कहर वाढत गेला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या आवाक्याच्या बाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली ...

हिंगोली जिल्ह्यात नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या बिनधास्तपणामुळेच कोरोनाचा कहर वाढत गेला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या आवाक्याच्या बाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली तरीही जिल्ह्यात व्यापाऱ्यांना शिथिलता देण्याची मागणी केली जात होती. अनेकांचे हातावरचे पोट असल्याने अशा किरकोळ विक्रेत्यांना पुढे करून मोठे व्यापारीच यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र आता दिवसाआड का होईना व्यापारासाठी मुभा मिळाली तर नियमांचे तीनतेरा वाजत असल्याचे कुणालाही काही सोयरसूतक दिसत नाही. बाजारपेठेत आज गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. शिवाय कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेले नियमही कुणी? पाळायला तयार नाही. ग्राहकही त्यासाठी जागरुक नाही आणि व्यापाऱ्यांना तर व्यापार करण्याच्या पलिकडे काही सुचत नसल्याचे दिसत आहे. सर्वात आधी मास्कबाबत साधी विचारणाही कोणी करीत नाही. अनेक व्यापाऱ्यांच्याच तोंडावरील मास्क आता हनुवटीपर्यंत खाली उतरल्याचे दिसत होते. ग्राहकांपैकी तर ४० टक्के लोकांना मास्कच नसल्याचे दिसून येत होते. याशिवाय सामाजिक अंतराचा नियमही असाच पायदळी तुडवला जात आहे. सामाजिक अंतरासाठीची वर्तुळे असूनही काही ठिकाणी वापर होत नव्हता. जेथे अशी वर्तुळेच आखली नाही, त्यांना तर बोलायचे कुणी? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी अथवा स्वत:साठीच अनेकांनी हात धुण्यासाठी अथवा सॅनिटायझेशन करण्यासाठी व्यवस्था केली नाही. तेथे ग्राहकांची दैना न विचारलेलीच बरी.

आज किराणा दुकानापासून ते इतर सर्वच ठिकाणी तुफान गर्दी दिसत होती. भाजी मंडईही विखुरलेली असताना पाय ठेवायला जागा नव्हती. अनेकांनी इतरत्र असलेली दुकाने पुन्हा भाजीमंडईत आणल्याचे चित्र आहे. एक दिवसाआड व्यापाराला मुभा असली तरीही काहींचे गाडे बंदच्या दिवशीही गल्लोगल्ली फिरत असल्याने मुभा दिलेल्या दिवशी मंडईतच दुकान लावण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्या घटल्याने सध्या प्रशासनही थोडे संथ झाले आहे. एवढे दिवस दंडाच्या पावत्या फाडत फिरणारी पथकेही आज कुठेच दिसत नव्हती. त्याचाही फायदा उचलला जात आहे. यामुळे पुन्हा संक्रमण वाढले तर आपल्याच व्यापाराची ऐसी तैसी होणार असल्याचे भानही उरले नाही.

ग्रामीण भागाला मास्कचे वावडे

शहरी भागातील तरी ९० टक्के लोकांकडे मास्क दिसून येतो. मात्र ग्रामीण भागातून येणाऱ्या ५० टक्के जणांकडेही मास्क दिसत नाही. त्यातच ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी येणाऱ्यांचे मोठे प्रमाण दिसून येते. त्यामुळे शहरी भागातीलही अनेकजण मास्ककडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तर दंड लावल्यास गयावया केली जाते. मात्र त्याच्या २० टक्के रक्कमेत येणारा मास्क खरेदी केला जात नाही.

नियम तोडला की चाचणी व्हावी

ज्या दिवशी बाजारपेठेला मुभा दिली त्या दिवशीही नियमांचे पालन न करणाऱ्यांसाठी फिरते आरोग्य पथक लावून अशांच्या चाचण्या केल्यास नियमांचे पालन करण्याची सवय लागू शकते. कोरोनाचा कहर कमी झाला म्हणून आलेला बिनधास्तपणा तिसऱ्या लाटेकडे नेणारा ठरू शकतो.