शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे पाच रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

हिंगोली : जिल्ह्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे पाच रुपयांनी भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे बाजारात पहायला मिळाले. डिसेंबर ...

हिंगोली : जिल्ह्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे पाच रुपयांनी भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे बाजारात पहायला मिळाले.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भाजीपाल्यांची आवक जास्त झाल्यामुळे भाजीपाला स्वस्त झाला होता. परंतु, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाली. त्यामुळे पाच रुपयांनी भाजीपाला महागला आहे. परिणामी ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे.

शहरातील मंडईमध्ये रविवारी टोमॅटो २५ रुपये किलो, फूलकोबी २० रुपये, पानकोबी २५ रुपये, ढोबळ मिरची ३० रुपये, अद्रक ५० रुपये, कोथिंबीर ३०, कडीपत्ता ८० रुपये, मिरची ६० रुपये, गाजर ४०, लिंबू २५ रुपये, काकडी २५ रुपये, चवळी ४० रुपये, भेंडी ४० रुपये, मुळा २५ रुपये किलोदराने विकला गेला.

मागच्या आठवड्यात मंडईमध्ये ढोबळ मिरची ३५ रुपये किलो, अद्रक ४५ रुपये, कडीपत्ता ७५ रुपये किलो दराने विकला गेला होता. डिग्रस, औंढा नागनाथ, कळमनुरी व जवळपासच्या खेड्यांतून येणाऱ्या भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाला महाग झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

वर्षाच्या शेवटी शेंगदाणा, सूर्यफूल आदी तेलात १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. तूरडाळ, मसूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळीचे भाव स्थिर असले तर तांदूळ मात्र ३ रुपयांनी महागला आहे. मागच्या आठवड्यात तेलाचे भाव १०० रुपये होते, आता तेलाचे भाव ११० ते ११५ झाले आहेत.

शहरातील मंडईमध्ये सफचंदाची आवक कमी झाली आहे. सफरचंद १०० रुपये किलोने विकले गेले. डाळिंब १०० रुपये किलो, चिकू ६० रुपये, पेरू ३० रुपये, संत्रा ४० रुपये, पपई ३० रुपये, टरबूज २० रुपये, खरबूज २० रुपये, स्ट्रॉबेरी १०० रुपये दराने विकली गेली.

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तांदळाचे भाव ५५ रुपये एवढे होते. वर्षाच्या सरतेशेवटी म्हणजे, शेवटच्या आठवड्यात तांदळाचे भाव ६० रुपये किलो झाले आहेत, असे व्यापारी विजय गुंडेवार यांनी सांगितले.