शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे पाच रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

हिंगोली : जिल्ह्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे पाच रुपयांनी भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे बाजारात पहायला मिळाले. डिसेंबर ...

हिंगोली : जिल्ह्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे पाच रुपयांनी भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे बाजारात पहायला मिळाले.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भाजीपाल्यांची आवक जास्त झाल्यामुळे भाजीपाला स्वस्त झाला होता. परंतु, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाली. त्यामुळे पाच रुपयांनी भाजीपाला महागला आहे. परिणामी ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे.

शहरातील मंडईमध्ये रविवारी टोमॅटो २५ रुपये किलो, फूलकोबी २० रुपये, पानकोबी २५ रुपये, ढोबळ मिरची ३० रुपये, अद्रक ५० रुपये, कोथिंबीर ३०, कडीपत्ता ८० रुपये, मिरची ६० रुपये, गाजर ४०, लिंबू २५ रुपये, काकडी २५ रुपये, चवळी ४० रुपये, भेंडी ४० रुपये, मुळा २५ रुपये किलोदराने विकला गेला.

मागच्या आठवड्यात मंडईमध्ये ढोबळ मिरची ३५ रुपये किलो, अद्रक ४५ रुपये, कडीपत्ता ७५ रुपये किलो दराने विकला गेला होता. डिग्रस, औंढा नागनाथ, कळमनुरी व जवळपासच्या खेड्यांतून येणाऱ्या भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाला महाग झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

वर्षाच्या शेवटी शेंगदाणा, सूर्यफूल आदी तेलात १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. तूरडाळ, मसूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळीचे भाव स्थिर असले तर तांदूळ मात्र ३ रुपयांनी महागला आहे. मागच्या आठवड्यात तेलाचे भाव १०० रुपये होते, आता तेलाचे भाव ११० ते ११५ झाले आहेत.

शहरातील मंडईमध्ये सफचंदाची आवक कमी झाली आहे. सफरचंद १०० रुपये किलोने विकले गेले. डाळिंब १०० रुपये किलो, चिकू ६० रुपये, पेरू ३० रुपये, संत्रा ४० रुपये, पपई ३० रुपये, टरबूज २० रुपये, खरबूज २० रुपये, स्ट्रॉबेरी १०० रुपये दराने विकली गेली.

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तांदळाचे भाव ५५ रुपये एवढे होते. वर्षाच्या सरतेशेवटी म्हणजे, शेवटच्या आठवड्यात तांदळाचे भाव ६० रुपये किलो झाले आहेत, असे व्यापारी विजय गुंडेवार यांनी सांगितले.