शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

आवक वाढल्याने भाजीपाला झाला स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलावांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे. शहरातील ...

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलावांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे. शहरातील भाजी मंडईमध्ये भांडेगाव, वळद, समगा, माळेगाव, इंचा, केंद्रा, डिग्रस, सेनगाव, पळशी, जवळा, नरसी आदी गावांतील विक्रेते पालेभाज्या विक्रीसाठी आणतात. ठोक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना भाज्यांची विक्री केली जाते. मकर संक्रांत दोन दिवसांवर येवून ठेपली असल्याने भाजीपाला स्वस्त झाल्याने ग्राहकांत आनंद आहे.

मंडईमध्ये टोमॅटो १० रुपये किलो, पानकोबी १० रुपये किलो, फूलकोबी १० रुपये, काकडी २५ रुपये किलो, चवळी २५ रुपये किलो, गाजर ३० रुपये किलो, कांदा ४० रुपये किलो, कारले ४० रुपये, ढोबळी मिरची ३० रुपये किलोने विक्री झाली. दुसरीकडे मंडईत वांगी, हिरवी मिरची, शेवगा आदींची आवक कमी होती. वांगी ४० रुपये, हिरवी मिरची ५० रुपये तर शेवगा शेंगा १०० रुपये किलोने विक्री झाल्याचे पहावयास मिळाले.

मकर संक्रांती सणाला तीळगुळाचा मान असतो. त्यामुळे तीळ आणि गुळ महाग होऊन तेल स्वस्त होईल, असे वाटले होते. परंतु, शहरातील बाजारपेठेत गुळ ३५ रुपये किलो, तीळ १३० रुपये किलो तर साखर ३५ रुपये किलो दराने विक्री झाल्याचे विजय बगडीया यांनी सांगितले.

मागच्या आठवड्यापेक्षा यावेळेस डाळिंबची आवक फारच कमी आहे. डाळिंब १५० रुपये किलोने विक्री होत आहे. सफरचंद १०० रुपये, चिकू ६० रुपये, केळी ३० रुपये, अननस ८० रुपये, संत्रा ८० रुपये तर जांब ४० रुपये किलोने मंडईत विक्री झाल्याचे पहायला मिळाले.

नवीन वर्षात इतर वस्तू स्वस्त झाल्या असला तरी तेलाचे भाव मात्र वाढलेले पहायला मिळत आहेत. सोयाबीन १३० रुपये किलो तर सूर्यफूल तेल १४० रुपये किलोने विक्री झाल्याचे दिसून आले.

शहरातील मंडईमध्ये मकर संक्रांतीच्या तोंडावर शेवगा, वांगी, हिरवी मिरची वगळता सर्व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव उतरले आहेत.

-तानाजी शितुळे, भाजीविक्रेता, खरबी.

मकर संक्रांत दोन दिवसांवर येवून ठेपली आहे. संक्रांतीला पालेभाज्यांचे दर वाढतील असे वाटले होते. परंतु, पालेभाज्या स्वस्त दरात मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांत आनंद आहे.

-सीमा नागरे, हिंगोली

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळांची आवक थोडी वाढली होती. यावेळेस सर्वच फळांची आवक कमी झाली आहे. डाळिंब १५० रुपयेकिलोने विक्री होत आहे.

-कयूम बागवान, फळविक्रेता, हिंगोली