शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सुरक्षिततेसाठी नाथजोगी समाज रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:54 IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा कचेरीवर ५ जुलै रोजी नाथजोगी समाजाचा मोर्चा धडकला. दिवसेंदिवस भटक्या जमातीतील व्यक्तीवर वाढणारे अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधवांचा मोर्चा निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा कचेरीवर ५ जुलै रोजी नाथजोगी समाजाचा मोर्चा धडकला. दिवसेंदिवस भटक्या जमातीतील व्यक्तीवर वाढणारे अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधवांचा मोर्चा निघाला.हिंगोली जिल्ह्यातील भटक्या जमातीतील नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजबांधवांनी सकाळी १0.३0 च्या सुमारास गांधी चौक येथून हा मोर्चा काढला. इंदिरा गांधी चौक, अग्रसेन चौक मार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात महिला, पुरूष व तरूणांची मोठी गर्दी होती. हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प होती. मुले पळवून नेणाºय टोळीतील समजून भटक्या जमातीतील पाच जणांची हत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडली होती. मयत हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवीचे आहेत. अशा घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे या समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिक्षा मागून पोट भरणे हे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. परंतु आता भटकंती करत असताना चोर, मुले पकडणाऱ्या टोळीतील समजून मारहाण केली जात असून हत्येच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने भटक्या समाजबांधवांना न्याय द्यावा. तसेच भिक्षा मागण्यासाठी गावो-गाव फिरणाºयांना पोलीस प्रशासनाने ओळखपत्र द्यावीत. धुळे जिल्ह्यातील हत्येच्या घटनेतील मारेकºयांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच मृत्यू झालेल्या कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी समाज बांधवांनी ५ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढला.या मोर्चात सहभागी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, युवा सेनेचे दिलीप घुगे, राम कदम यांच्यासह भटक्या विमुक्त विकास परिषद संचलित नाथजोगी विकास सेवा संस्था अध्यक्ष नारायण बाबर, सिद्धूनाथ शिंदे, आप्पा काशीराम शिंदे आदींच्या निवेदनावर स्वाक्षºया आहेत.नाथजोगी समाजाच्या मोर्चात अबालवृद्ध सहभागी झाले होते. जिल्ह्यात आधीच कमी लोकसंख्या असलेल्या या समाजातील जिल्ह्याच्या विविध भागात राहणाºयांनी हजेरी लावली होती. महिला, वृद्ध, लहान मुलेही या मोर्चात दिसून येत होते. आम्हाला न्याय द्या सरकार न्याय द्या, संरक्षण मिळालेचपाहिजे, राईनपाड्यातील मृतांच्या नातेवाईकांना भरघोस मदत द्या, भटक्यांना ओळखपत्र द्या आदी मागण्यांचे फलक घेवून रस्त्यावर उतरले होते. अगदी शिस्तीच्या मोर्चात नाथजोगी समाजाच्या पारंपरिक वाहनांवरील पालख्याही सहभागी केल्याचे चित्र होते.मोर्चासाठी आलेल्या प्रत्येकाने पदरी भाजी-भाकरी बांधून आणली होती. मोर्चा आटोपल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास ही सर्व मंडळी जि.प. शाळेसमोर पाण्याच्या टाकीखाली सामूहिक भोजनास बसली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा