शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पीकविम्यासाठी हजारो शेतकरी कृषी कार्यालयावर धडकले; लेखी आश्वासनानंतर हटले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2022 18:49 IST

विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परताव्याची तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.

हिंगोली : शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झाल्यानंतरही पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोर्चा काढून कृषी विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर यात १५ दिवसांत संरक्षित रक्कम तसेच प्रलंबित १३.८९ कोटी देण्यााचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक मागे हटले.

सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची प्रचंड नासाडी झाली. उत्पन्न घटले. मात्र  विमा कंपनीकडून नुकसान  भरपाई म्हणून मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर  विमा परताव्याची तुटपुंजी रक्कम जमा झाली. तर अनेकांना जुनाच विमा मिळाला नसताना नवीन विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात दि. २३ डिसेंबर रोजी हिंगोली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर ,  माजी जि.प. महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर, भास्करराव पाटील , गजानन कावरखे , नामदेव पतंगे , परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामराव अडकिने, मधुकर जामठीकर, कैलास वाबळे, भागवत मुटकुळे आदींसह सेनगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मुख्य मार्गाने हा मोर्चा निघाला. तेथून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडकला.तेथे शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असता तुपकर , गोरेगावकर यांच्या शिष्टमंडळाशी  जिल्हा कृषी अधिकारी व विमा कंपनी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली .